शेतकऱयांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा : अधिकाऱयांना निवेदन
प्रतिनिधी /बेळगाव
झोपडपट्टीत राहणाऱया शेतकऱयाने अल्पवयीन मुला-मुलीला ठेवून घेतल्याचा आरोप करत त्या शेतकऱयावर पोक्सोसारखा गंभीर गुन्हा दाखल केला होता. पोलिसांनी खोटा अहवाल दाखल करून शेतकऱयाला या गुन्हय़ात गुंतविले आहे. महत्त्वाचे म्हणजे या गुन्हय़ामध्ये पैशांचा मोठा व्यवहारदेखील झाला असून निर्दोष शेतकऱयाला न्याय द्यावा, या मागणीसाठी शेतकऱयांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून निवेदन दिले.
होनगा येथील नामदेव यल्लाप्पा धुडूम हा शेतकरी शेतामध्ये झोपडी बांधून राहतो. शेतामध्ये काम करून आपला उदरनिर्वाह करतो. असे असताना कडोली आणि घुग्रेनहट्टी या गावातील मुलगा व मुलगी त्या शेतकऱयाच्या घरात राहिल्याचा आरोप करत त्या शेतकऱयावर गुन्हा दाखल केला आहे. त्या मुला-मुलीने आम्ही तेथे राहिलो नाही, असे सांगितले असतानाही काकती पोलिसांनी गुन्हा दाखल करून त्या निष्पाप शेतकऱयाला अटक केली आहे.
यामुळे शेतकऱयाचे आणि त्याच्या कुटुंबीयांचे मोठे नुकसान झाले आहे. तेव्हा त्या शेतकऱयाला न्याय द्यावा आणि पोलिसांची वरि÷ अधिकाऱयांनी चौकशी करून दोषी पोलिसांवर कारवाई करावी, अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे. गेल्या तीन महिन्यांपासून शेतकरी कारागृहात होता. त्यामुळे त्या शेतकऱयाच्या कुटुंबीयांवर मोठा अन्याय झाला आहे. त्याची नुकसानभरपाईही द्यावी, अशी मागणीही करण्यात आली आहे.
शिरस्तेदार नदाफ यांना निवेदन देण्यात आले. यावेळी आप्पासाहेब देसाई, नामदेव धुडूम, मनोहर परमाचे, सिद्धाप्पा वारी, जोतिबा बेळगावकर, लक्ष्मी धुडूम, सुनिता धुडूम, यल्लू धुडूम यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.