कोरोना व तौक्तs वादळात केले अन्न-धान्याचे वाटप
डिगस / वार्ताहर–
मानवी जीवनात सेवा हा मोठा धर्म मानला जातो. सद्यकालीन कोरोना परिस्थितीमध्ये व नुकत्याच झालेल्या तोक्ते वादळाने सर्वसामान्य व गरीब जनतेचे आर्थिक व मानसिक मोठे नुकसान झाले आहे. याला आधार मिळावा यासाठी त्रिपुरा फाउंडेशन इंडिया या संस्थेमार्फत सिंधुदुर्ग जिल्हय़ामध्ये ४० निराधार व्यक्ति तसेच तोक्ते वादळात नुकसान झालेल्या १० गरीब व्यक्तींना रेशन धान्य वितरित करण्यात आले. यामध्ये कसाल, वायरी, गोवेरी व डिगस या गावात जिवनावश्यक वस्तुचे वितरण करण्यात आले. संस्थापक डॉ. बास्करण पिल्लई यांनी सुरू केलेली त्रिपुरा फाउंडेशन हि संस्था समाजातील गरीब वंचित मुलांना विनामूल्य शिक्षण, गरीब व गरजू लोकांना उदरनिर्वाहसाठी अन्न पुरविते. हि संस्था गेल्या २० वर्षापासून नेहमीच दारिद्रय़, उपासमार व पीडा दूर करण्याच्या दृष्टीने प्रयत्नशील आहे.
1990 मध्ये चेन्नई येथे समाजातील गरजू, गरीब आणि होतकरू मुला – मुलींना एकत्रित करून त्यांच्या शिक्षणाची व्यवस्था करण्यात आली. संस्थेचे शिक्षण क्षेत्रात उचललेले हे पाfहले महत्त्वाकांक्षी पाऊल आहे. यामध्ये मुले आणि मुली यासाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली होती. पुढे-पुढे त्याचा विस्तार होत गेला आणि ३०१० मध्ये पाहिले होप सेंटर तामिळनाडू मध्ये सुरुवात करण्यात आले व पुढे गोवा, महाराष्ट्र या राज्यामध्ये होप सेंटर सुरू करण्यात आली. सद्यस्थितीत १६ राज्यामध्ये १६० केंद्राच्या माध्यमातून हा उपक्रम सुरू आहे. सिंधुदुर्ग जिल्हय़ामध्ये या संस्थेमध्ये काम करणाऱया कर्मचारी वर्गाने येथील गरीब व निराधार लोकांचा शोध घेत त्यांच्या पर्यंत धान्य पोहोचविण्याचे कार्य सुरु ठेवले आहे. सदर अभियान हे गरजु निराधार गाfरब व्यक्तींनसाठी असुन त्यांचे जीवनमान सुधारण्यासाठी आहे, तरी या अभियानात आपले सहकार्य अथवा कोणाला संस्थेचे सहकार्य हवे असल्यास निलेश नाईक (9765277224) यांच्याशी संपर्क साधावा.