कमाल 21.3 वर, खऱया अर्थाने महाबळेश्वरचा पहिल्यांदाच अनुभव : वादळाचा परिणाम
प्रतिनिधी/ बेळगाव
शनिवारी पहाटेपासूनच ढगाळ वातावरण आणि थंडीने शहरासह संपूर्ण परिसर गारठला होता. पहिल्यांदाच खऱया अर्थाने महाबळेश्वरचा अनुभव सर्वांनाच आला. पारा तब्बल 7.3 अंशांवर घसरल्याने सर्वांच्याच अंगामध्ये हुडहुडी भरली होती. ढगाळ वातावरण आणि दिवसभर थंडी यामुळे एक वेगळा अनुभव सर्वांनाच आला. मात्र, यामुळे आरोग्याच्या समस्या निर्माण होण्याची भीतीदेखील व्यक्त होत होती.
बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचा पट्टा तयार होऊन चक्रीवादळ निर्माण झाले होते. तामिळनाडू आणि पाँडिचेरी यांना या वादळाचा जोरदार फटका बसला. त्यानंतर त्याचे परिणाम बेळगाव परिसरातही दिसू लागले आहेत. शनिवारी सकाळपासूनच ढगाळ वातावरण आणि हवेमध्ये गारठा निर्माण झाला होता. शनिवारी किमान तापमान 7.6 अंशांवर घसरले होते. कमाल तापमान 21.3 वर पोहोचले आहे. यामुळे उबदार कपडय़ांचा आधार घ्यावा लागत आहे.
गेल्या काही वर्षांमध्ये जोरदार पाऊस आणि कडाक्मयाची थंडी पडत आहे. सरासरीपेक्षा दुप्पट पाऊस पडत असून थंडीमध्येही वाढ झाली आहे. 10 ते 15 दिवसांपूर्वी थंडीला सुरुवात झाली. त्यामुळे पाऊस गेला, अशीच नागरिकांची समजूत झाली. मात्र बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचा पट्टा तयार होऊन पुन्हा ढगाळ वातावरण आणि हवेत गारवा निर्माण झाला आहे.
आरोग्याच्या समस्या
वारंवार बदलणाऱया या हवामानामुळे आरोग्याच्या समस्या निर्माण होत आहेत. कोरोनासारख्या महाभयंकर आजाराशी झुंजत असताना निसर्गाच्या या लहरीपणामुळे आणखी गंभीर परिस्थिती निर्माण होत आहे. शनिवारी पहाटेपासूनच जोरदार वारा आणि ढग दिसून येत होते. काही ठिकाणी पावसाचा शिडकावा झाला. या थंडीमुळे नागरिकांना उबदार कपडय़ांचा आधार घ्यावा लागला आहे. नोव्हेंबरमध्ये पावसाचा शिडकावा होत असल्यामुळे एकप्रकारे निसर्गाचा समतोलपणाच बिघडत असल्याचे दिसून येत आहे.
हवामानाचा परिणाम पिकांवरही
गेल्या दोन वर्षांमध्ये तर हवामानामध्ये मोठय़ा प्रमाणात बदल होताना दिसत आहे. पावसाळय़ातच नाही तर हिवाळय़ामध्येही पाऊस पडत आहे. त्यामुळे या हवामानाचा परिणाम पिकांबरोबरच नागरिकांच्या आरोग्यावर होताना दिसत आहे. पारा उतरल्यामुळे खोकला, सर्दी, फ्लु यासारखे आजार डोके वर काढण्याची शक्मयता आहे. कोरोनाचा संसर्गही पुन्हा वाढण्याची शक्मयता नाकारता येत नाही.