प्रतिनिधी/ येळ्ळूर
दोन दिवसांपूर्वी झालेल्या दमदार पावसामुळे येळ्ळूर-सुळगा शिवारामध्ये बांध फुटून मोठे नुकसान झाले आहे. या पावसामुळे अनेक शेतकऱयांच्या जमिनीतील बांध फुटले. त्यामुळे शेतकऱयांना नुकसान झाले आहे. सोमवारी झालेल्या दमदार पावसामुळे हे नुकसान झाले आहे.
सुळगा, येळ्ळूर, देसूर, राजहंसगड परिसरात तब्बल दोन ते तीन तास दमदार पाऊस कोसळला. या पावसामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाले. शिवारातून पाणी जोरदार आल्यामुळे अनेक शेतकऱयांचे बांध फुटून गेले. त्यामुळे भात, सोयाबिन आणि बटाटा या पिकांचे नुकसान झाले आहे. पावसाने चांगली साथ दिली तरी अशा प्रकारे अचानक झालेल्या जोरदार पावसाचा फटका काही शेतकऱयांना बसला आहे.
येळ्ळूर, सुळगा परिसरात यावषी भात पिक जोमात आहे. शेतकऱयांनी सर्व कामे पूर्ण केली आहेत. बांधांना वगरा तसेच हद्दीसाठी बरगा(वरी) याची लागवड केली आहे. दरवषी शेतकरी या प्रकारे लागवड करतात. मात्र सोमवारी झालेल्या दमदार पावसामुळे बांधांचे मोठे नुकसान झाले आहे. याचबरोबर अनेक शेतकऱयांच्या शेतामध्ये भगदाडही पडले आहे. त्यामुळे शेतकऱयांचे मोठे नुकसान झाले आहे.