खा. श्रीनिवास पाटील : नवरत्न दर्पण पुरस्कारांचे वितरण
प्रतिनिधी/ सातारा
पत्रकार हा पारदर्शक आहे, वाटाडय़ा आहे. तुम्ही ज्या ज्या गोष्टींत पारंगत आहात त्या त्या गोष्टी समाजाला उकलून सांगा. फुगवून सांगू नका. स्पष्ट रुपात बातमी यावी, लोकांना त्याचे ज्ञान व्हावे, त्यासाठी ‘दर्पण’कार बाळशास्त्राr जांभेकरांचा आदर्श व राम शास्त्री प्रभुणेंचा बाणेदारपणा अंगी बाळगावा, असे आवाहनही खा. श्रीनिवास पाटील यांनी केले.
महाराष्ट्र जर्नालिस्ट फौंडेशन यांच्यावतीने व सातारा जिल्हा पत्रकार संघाच्या सहकार्याने पत्रकार दिनाचे औचित्य साधून येथील शाहू कलामंदिरात नवरत्न दर्पण पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी आ. शिवेंद्रराजे भोसले होते. व्यासपीठावर जिल्हा पोलिस प्रमुख तेजस्वी सातपुते, नगराध्यक्षा सौ. माधवी कदम, माहिती व जनसंपर्क महासंचलनालयाचे संचालक प्रशांत सातपुते, जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष हरीष पाटणे, शहर पत्रकार संघाचे अध्यक्ष विनोद कुलकर्णी, युवा नेते सारंग पाटील, महाराष्ट्र जर्नालिस्ट फौंडेशनचे अध्यक्ष डॉ. राजीव लोहार, महिला विभाग अध्यक्षा सौ. मनिषा लोहार यांची प्रमुख उपस्थिती होती.
खा. श्रीनिवास पाटील म्हणाले, पत्रकारांनीही जे दिसतंय ते मांडल पाहिजे. काही झाकायचं नाही, काही लपवायचं नाही, काही खपावं म्हणून नाही व लोकांना रूचत नाही म्हणून करायचं नाही. पत्रकार मुळातच प्रचंड नसतो तो आपल्या लेखणीच्या जोरावर हळूहळू वाटचाल करतो व नंतर लोकांमध्ये जनभावना पसरते. तुमची क्रेडीबिल्टी तुमच्या लेखनातून सांभाळायची असल्याचे त्यांनी सांगितले.
हा रामशास्त्राr प्रभुणेंचा सातारा आहे. रामशास्त्राr प्रभुणेंच्या बाण्याने पत्रकारिता करणारे अनेकजण सातार्यात आहेत. हरीष पाटणे हे नाव आता सातारा जिह्यापुरते मर्यादित राहिलेले नाही. ते राज्यभर पसरले आहे. हरीषजी एक तर तुम्ही अशा लोकांचे संशोधन करा. पुस्तक काढा. शिपायापासून संपादकापर्यंत काम करणारे काहीजण आहेत. ही केवढी मोठी गोष्ट आहे. हरीष पाटणे हे केवळ सातारा जिल्हा पत्रकार संघाचे काम करत नाहीत तर त्यांनी राज्यव्यापी पत्रकारांचा मेळावा यशस्वी केला आहे. पत्रकारांच्यावर होणारे हल्ले व त्यांचे संरक्षण यासाठी कायदा व्हावा म्हणून त्यांनी मोठे काम केले असल्याचे सांगताना खा. श्रीनिवास पाटील यांनी उपस्थित पत्रकारांना विधायक पत्रकारितेचा कानमंत्र दिला.
आ. शिवेंद्रराजे म्हणाले, पत्रकार व सातारकर म्हणून तुमच्याशी माझे चांगले संबंध आहेत. जे योग्य व चुकीचे आहे ते म्हणण्याची धमक सातारच्या पत्रकारांमध्ये आहे. काही पत्रकार आज हयात नाहीत. पण त्यांना आपण विसरू शकत नाही. तेवढ नातं त्यांनी आपल्याशी निर्माण केले आहे. पत्रकारांचे कुटूंब सावरण्याचे काम सातारा जिल्हा पत्रकार संघाकडून केले जात आहे. याचा मी अत्यंत जवळचा साक्षीदार आहे. मोबाईल व सोशल मीडियामुळे झटकन बातमी समजते. सातारच्या पत्रकारितेत याचा विचार होणे आवश्यक आहे. वृत्तपत्र हे कधीही बंद होणार नाही. अमेरिकेसारख्या विकसित देशांमध्ये अजूनही वृत्तपत्रांना मागणी असल्याने देशातही वृत्रपत्रे बंद होणार नाहीत. नवनवीन तंत्रज्ञान पत्रकारांनी आत्मसात करावे. जे चांगले आहे ते चांगल म्हणायची व चुकतंय ते चुकीचं आहे हे म्हणण्याची ताकद सातारच्या पत्रकारितेत आहे.
जिल्हा पोलिस प्रमुख तेजस्वी सातपुते म्हणाल्या, पत्रकारांचा पुरस्काराने गौरव होत आहे. ही अभिनंदनीय बाब आहे. समाजासाठी काम करताना पत्रकार नेहमीच सकारात्मक दृष्टीने कार्यरत असतो. सातार्यातील पत्रकारांनी समाजासाठी योगदान देवून विधायक पत्रकारिता आणखी पुढे न्यावी, असेही आवाहनही त्यांनी केले.
हरीष पाटणे म्हणाले, ‘दर्पण’कार आचार्य बाळशास्त्राr जांभेकर यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून सातारा जिह्यातील पत्रकार काम करत आहेत. पत्रकारांच्या विविध प्रश्नांवर जिह्यातील सर्वच सहकारी पत्रकारांच्या सोबतीने सातत्याने आवाज उठवला आहे. जिह्यातील काही पत्रकारांवर ज्या ज्यावेळी नियतीने घाला घातला. त्या त्या वेळी जिह्यातील पत्रकार व समाजातील विविध घटकांच्या मदतीने काम केले. अशा पत्रकारांचे कुटुंब सावरण्यासाठी प्रयत्न केले. पत्रकारांच्यावर होणारे हल्ले असतील, त्यासाठी करावे लागणारे आंदोलन असेल, यासाठी जिह्यातील सर्व पत्रकारांचे सहकार्य मिळत गेले. पत्रकार संरक्षक कायदा होण्यासाठी सातारा जिह्यातील पत्रकारांचे मोठे योगदान असल्याचेही हरीष पाटणे यांनी सांगितले.
यावेळी प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया, सामाजिक व विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान व्यक्ती यांचा नवरत्न दर्पण पुरस्काराने गौरव करण्यात आला. सूत्रसंचलन विजय लोहार यांनी केले.