प्रतिनिधी/ बेळगाव
दहावीची परीक्षा दि. 25 जूनपासून घ्यायचे जाहीर झाले तरी याबाबत सरकारकडून योग्य ती मार्गसूची येणे गरजेचे आहे. ती येताच तुम्हाला सर्व ती माहिती पुरविली जाईल. मात्र, या परीक्षेच्या तयारीला आतापासूनच लागा, अशी सूचना जिल्हाधिकारी डॉ. एस. बी. बोम्मनहळ्ळी यांनी जिल्हय़ातील अधिकाऱयांनी केली आहे.
दहावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रांपर्यंत पोहोचविण्यासाठी बस नसल्यामुळे त्यांना तेथेच राहण्याची सोय करता येते का? याबाबत चर्चा करा. त्यानंतर तो निर्णय घेतला जाईल. कोरोना क्षेत्रात कोणत्याही प्रकारच्या परीक्षा घेऊ नयेत. कोरोना क्षेत्राच्या बाहेरच परीक्षा घ्याव्यात, अशी सूचना त्यांनी केली आहे. दोन विद्यार्थ्यांमध्ये एक मीटरचे अंतर असणे गरजेचे आहे.
विद्यार्थ्यांनी घरातून येताना जेवण करूनच परीक्षा केंद्रावर यायचे आहे. त्या ठिकाणी कोणीही जेवणाचा डबा आणू नये, अशी ताकीद करण्यात आली आहे. केवळ पाणी आणि तोंडाला मास्क विद्यार्थ्यांनी आणायचे आहे. परीक्षा केंद्रामध्ये जाताना प्रत्येक विद्यार्थ्याचे सॅनिटायझर करूनच प्रवेश द्यावा. कोणत्याही प्रकारचा आजार असेल तर त्या विद्यार्थ्यांची इतर वर्गांमध्ये स्वतंत्र सोय करावी, असे त्यांनी सांगितले.
यावषी पुराबाबत आतापासूनच दक्षता घ्या
याचबरोबर मागीलवषी आलेल्या पुरामध्ये अनेकांची घरे कोसळली होती. त्यांना घरे मंजूर झाली आहेत. त्यांची रक्कम दिली असताना अजूनही त्यांनी घर बांधले नाही. त्यामुळे त्यांची पूर्ण माहिती जमा करावी, असे जिल्हाधिकाऱयांनी सांगितले. यावषी पुराबाबत आतापासूनच दक्षता घ्या. नदीकाठावर असलेल्या गावांना वरचेवर भेटी द्या, त्यांच्या समस्या जाणून घ्या, असे जिल्हाधिकाऱयांनी अधिकाऱयांना सांगितले. एनडीआरएफ पथक सज्ज आहेत. वेळ आल्यानंतर ती पथके रवाना केली जातील, असेही त्यांनी स्पष्ट केले.
महाराष्ट्रातून येणाऱया लोकांवर अधिक लक्ष द्या. कोरोनाबाबत सावधानता बाळगणे गरजेचे आहे. तेव्हा परराज्यांतून कोणीही आले तर त्यांना क्वारंटाईनमध्ये ठेवलेच पाहिजे, असे त्यांनी यावेळी सांगितले.
या व्हिडिओ कॉन्फरन्सला जिल्हा पंचायतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी के. व्ही. राजेंद्र, पोलीस आयुक्त बी. एस. लोकेशकुमार, जिल्हा पोलीसप्रमुख लक्ष्मण निंबरगी, प्रांताधिकारी अशोक तेली यांच्यासह तहसीलदार व इतर अधिकारी उपस्थित होते.