पिराजी कुऱहाडे / खानापूर
दारी तुळस हिरवीगार पहा ते संताचा दरबार’ या संतानी रचलेल्या नामस्मरणातील अभंग रचनेला आज शतकोत्तरही अभंग रचनेला सार्थक ठरणारी तुलसीचा विवाह महिमा आजही कायम आहे. कार्तिक पौर्णिमेच्या नंतर कार्तिक द्वादशी ते कार्तिक पंचमीपर्यंत तुळशी विवाह सोहळा देशात साजरा केला जातो. या तुळशी विवाह परंपरेला मोठा इतिहास असल्याच्या कथा पूराणात आहेत.
तूलशी वृंदावन हे हिंदूचे प्रतिक मानले जाते. प्रत्येक घरासमोर तूळस असतेच .सकाळी तुळशी समोर रांगोळी टाकून पूजा करणे हे सुहासिनिचे नित्य काम असते. आजही ही परंपरा प्रत्येक खेडेगावात रूजलेली आहे. कार्तिक एकादशीला तुळशी विवाहाला प्रारंभ होतो. त्यानुसार कार्तिक एकादशीनंतर गुरुवारपासून तुळशी विवाहाना प्रारंभ झाला आहे.
हिंदू धर्मात तुळशीविवाह अधिक महत्त्व आहे. आषाढी एकादशी नंतर कार्तिक एकादशीपर्यंत चातुर्मासाच्या काळात विशेषतः हिंदू धर्मात विवाह सोहळे केले जात नाहीत. पण अलीकडच्या काळात याही परंपरेला फाटा मिळत असला तरी धार्मिक रीतिरिवाज पाळणारे हिंदू धर्मीय तुळशी विवाहानंतर लग्न सोहळय़ाला सुरुवात करतात. यावषी कोरोना महामारीच्या गडद प्रसंगामुळे गेल्या या मार्चपासून आषाढी एकादशीपर्यंतच्या काळामध्ये लग्न सोहळे करणे कठीण झाले. लॉकडाऊनचा काळ निर्माण झाल्याने अनेकांच्या बाहुल्यावर चढण्याच्या उत्साहावर विरंजन पडले. मोजक्मया व्यक्तींच्या उपस्थितीत थोडय़ाफार मंडळींनी विवाह सोहळे पार पडले असले तरी अनेकांचे विवाह लॉकडाऊनच्या काळात करणे जमले नाही. त्यामुळे यावषी तुळशी विवाहपासूनच विवाह सोहळय़ाला सुरुवात झाली आहे. कार्तिक एकादशीचा मुहूर्त झाल्यानंतर लागलीच कार्तिक द्वादशी दिवशी अनेक गावात विवाह सोहळे पार पडले. गेल्या सहा महिन्यापासून थांबलेली विवाहाची रणधुमाळी आता पुन्हा एकदा वेगाने सुरू होताना दिसत आहे. परंतु कोरोना महामारीचा विळखा पुन्हा वाढता लक्षात घेता अनेकांनी घाईगडबडीने लग्न सोहळे ऐकूण घेण्याचा बेत आखला आहे. तुळशी विवाह हा हिंदू धर्मातील पवित्र सण मानला जातो या विवाह सोहळय़ानंतर अनेकांच्या घरात आता सनई-चौघडा वाजण्यास सुरुवात झाली आहे. पण देशभरात कोरानाचा पुन्हा शिरकाव हा नजीकच्या काळात यावषीच्या धार्मिकसणाना पुन्हा हा खंड पाडील का, अशी भीती अनेकांच्या मनात निर्माण झाल्याने आतापासूनच लग्न सोहळा विवाह सोहळा करण्यास सुरुवात झाली आहे.
शाळीग्रामचा अवतार बाळकृष्ण हा तूळशीचा वर
तुळशी विवाहाला प्रारंभ झाल्याने घराघरातील तुळशी विवाहाला रंगरंगोटी करुन सजवणे, ज्यांच्या घरी तुळशी स्थापन केली नाही. अशानी लहान, मोठय़ा आकारातील आकर्षक तुळशी वृंदावन खरेदी करुन विवाह सोहळे केले जातात. तुळसीच्या लग्नासाठी लागणार सौभाग्य लेण, नवीन वस्त्र, लागणाऱया चिंचा, आवळे, फळे, फुले आदीनी तुळशी वृंदावनाला सजवण्याची प्रथा आहे. तुळशीचे लग्न हा पुजोत्सव आहे. त्यात तुळसही वधू, शाळीग्रामचा अवतार बाळकृष्ण हा वर तर ऊस हा मामा समजला जातो. तुळशी वृंदावनाला रंगरांगोटी करुन सजवले जाते. तुळसीभोवती रांगोळी काढली जाते. वृंदावनासभोवार ऊस उभारुन आवळे, चिंचा त्यामध्ये ठेवल्या जातात. त्यानंतर स्नान, अभिषेक, नवीन वस्त्र, नवीन साज तसेचनैवैद्य अर्पण करुन तुळसीमध्ये आळवणी केली जाते. त्यानंतर तुळशीची षोडशोपचाराने पूजा करुन सौभाग्यलेन आदी अलंकारीत करुन सजविले जाते. तुळस आणि श्रीकृष्ण विवाहसमयी चौरंगाच्या एका बाजूस श्रीकृष्ण तर दुसऱया बाजूस तुळशीचे रोप ठेवून दोघामध्ये आंतरपाठ धरला जातो. मग सर्वाना अक्षतावाटल्या जातात. मंगलाष्टकाने तुळशीचा विवाह केला जातो.
तुळशीच्या पानाला अधिक महत्व
विशेषत: तुळशी विवाह हा गोरज मुहूर्तावर करण्याची परंपरा आहे. तालुक्याच्या ग्रामीण भागात तुळसी विवाहप्रसंगी परिसरातील नागरिकांना रितसर पाहुणचार म्हणून बोलाविण्याची परंपरा आहे. तुळशी विवाहाला बोलावणे झाले की, आजूबाजूचे नागरिक मोठय़ा संख्येने उपस्थित राहतात. तुळशी विवाह परंपरा ही हिंदू धर्मात पावित्र मानली जाते. कारण तुळशीच्या लग्नानंतर धार्मिक परंपरेनुसार लग्न जुळवण्याची प्रथा आहे. तुळशीच्या पानाला अधिक महत्व आहे. तुळशीच्या पानावरचे उदक मस्तकावर धारण केले तर गंगा स्नानाचे पुण्य लागते. तर मरतेवेळी अंगावर तुळशी पत्री असेल तर ती व्यक्ती वैकुंठास जाते, इतके महत्व हिंदू धर्मामध्ये तुळशीला आहे. म्हणून तालुक्याच्या ग्रामीण भागात तुळशी विवाहाला विशेष प्राधान्य देवून मोठय़ा उत्साहात विवाह सोहळा करण्याची परंपरा अविरतपणे सुरु आहे.
तुळशी विवाहानंतर विवाह संमारंभ परंपरा
हिंदु धर्मात तुळशी विवाह परंपरेला विशेष प्राधान्य दिले जाते. कार्तिक पौर्णिमेच्या शुभमुहुर्तावर होणाऱया या तुळशी विवाहानंतर हेदू धर्म परंपरेनुसार प्रत्येकाच्या घरात विवाह समारंभ आयोजनास मुभा मिळते. तुळशी विवाहनंतर विवाह जमवण्यासाठी वधू-वराची निवड करुन लग्न सोहळय़ाचे उधाण सुरु होते. ते आषाढी एकादशीच्या काळापर्यंत चालतात. आषाढी पौर्णिमेनंतर कार्तिक पौर्णिमेपर्यंत विवाह करणे अथवा जमवणे हिंदू धर्मात केले जात नाहीत, म्हणून कार्तिक पौर्णिमेनंतर विवाह सोहळय़ांचे आयोजन करण्याची परंपरा आजही आहे. हलशी या कदंबकालीन मंदिराच्या परिसराला विशेष महत्व आहे. अनेक मंदिरे इतिहासाची साक्ष देतात. त्या काळापासून हलशीच्या पंचक्रोशीत वसलेले जवळील हत्तरवाड गाव तूळशी महात्म्याने परिचित आहे. या गावात दरवर्षी तुळशी विवाह सामुदायिकरित्या मोठय़ा प्रमाणात उत्साहाने कार्तिक पोर्णिमेला साजरा केला जातो.
खानापूर तालुक्यातील नवसाला पावणारी देवता मानल्या जाणाऱया हत्तरवाड येथील एक गाव एक तुळशी विवाह सोहळा रविवार दि. 29 नोव्हेंबर रोजी रात्री 8 साजरा होणार आहे. दरवर्षीप्रमाणे पारंपारिकरित्या साजरा होणारा हा विवाह सोहळा म्हणजे शक्ती देवतेचा उत्सवच म्हणावा लागेल. पण यावषी कोरोना महामारीच्या वाढत्या धास्तीमुळे सर्वच गावात हा सोहळा साधेपणाने आयोजित कण्याचा निर्णय ग्रामस्थानी घेतला आहे.
तालुक्यातील हत्तरवाड, किरहलशी येथील सामूहिक तुळशी विवाहाला एक वेगळेच महत्व आहे. हत्तरवाड येथील गावच्या मध्यभागी असलेली व गावात एकमेव असलेली नवसाला पावणाऱया तुळशी विवाहाला तर वेगळेच महत्व आहे. येत्या रविवार दि. 29 रोजी रात्री 9 ते 10.30 या काळावधीत केवळ पंचकमिटीच्या उपस्थितीत एक गाव एक तुळशी विवाह सोहळा होणार असुन इतक्मया साधेपणाने होणारा हा सोहळा गेल्या दोन दशकातील पहिलीच वेळ म्हणावी लागेल.
हत्तरवाड येथे पूर्वापार गावच्या मध्यभागी असलेल्या तुळशी वृंदावनाचे महत्व वेगळे आहे. सर्व गावकरी मिळून वृंदावनाचा विवाह आणि कार्तिकोत्सव दरवर्षी साजरा होतो. या उत्सवाला गावातील सर्व माहेरवासिय मुली गावी एकत्र आलेले असतात. मेंढेगाळी येथे एक गाव एक तुळशी विवाह केला जातो. मेंढेगाळी गावच्या मध्यभागी श्री कालीकादेवीचे मंदिर आहे. त्या मंदिरासमोर गावातील एकमेव तुळस आहे. संपूर्ण गाव याच तुळसीची पूजा करतात.