जिल्हाधिकाऱयांनी पंधरा दिवस अगोदरच आदेश काढायला हवा
प्रतिनिधी/ सातारा
कोरोनाने सर्वच सणांवर बंदी आणली आहे. कोरोनामुळे सणांवरचा उत्साह पुरता निघून गेला आहे. आता दिवाळी काही दिवसांवर येवून ठेपली आहे. दिवाळीच्या सणाला फटाके वाजवण्यावर बंदी आणावी अशी मागणी सध्या होत आहे. परंतु जिल्हाधिकाऱयांनी याच अनुषंगाने अगोदरच फर्मान काढणे आवश्यक आहे, अशी चर्चा सध्या सातारा शहरात सुरु आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर फटाक्यावर बंदी हवी अशी एका बाजूला मागणी होत आहे तर दुसऱया बाजूला फटाके विक्रेत्यांनी माल खरेदी करुन ठेवला आहे. त्यांचे नुकसान होणार असल्याने बंदी नको, अशी मागणी होवू लागली आहे.
फटाक्यांमुळे प्रदुषण होते, फटाके वाजवू नका, असे आवाहन सातत्याने केले जाते. शाळांमध्ये फटाकेमुक्त दिवाळी साजरी करण्याची शपथ विद्यार्थ्यांना दिली जाते. दरवर्षीच असे कार्यक्रम राबवण्यात येतात. यावर्षी तर चक्क कोरोनामुळे कोणताही सण हा उत्साहाने साजरा करता आला नाही. त्यामुळे सण, उत्सव यातील उत्साह निघून गेला आहे. कोरोनाची धास्ती अजूनही कायम आहे. त्यातच आता दिवाळीमध्ये फटाके बंदी हवी असा सुर काही साताकर आळवू लागले आहेत. तर साताऱयाच्या फटाके विक्रेत्यांनी माल खरेदी केल्याने अचानक बंदी केल्यास नुकसान होण्याची भिती व्यक्त होवू लागली आहे. दरम्यान, फटाका बंदी घातली पाहिजे, अशा आशयाचे एक आवाहनपर पत्रच सोशल मीडियावर फिरत आहे. ते पुढील प्रमाणे फटाक्यांवर बंदी घातली पाहिजे, एक अतिशय विनम्र विनंती, मित्रांनो, कोरोना पीडितांना श्वास घेताना सर्वात जास्त त्रास होतो. हे फुफ्फुसांशी संबंधित आहे आणि जे कोरोनामधून बरे होतात त्यांना पूर्णपणे सामान्य होण्यासाठी खूप वेळ लागतो. आता सर्वत्र कोरोनातुन बरे झालेल्या रुग्णांची संख्या जास्त आहे. म्हणूनच, शपथ घ्यावी की यावर्षी कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर आम्ही आणि आमचे संपूर्ण कुटुंब दीपावलीत फटाके फोडणार नाही. आणि तुमच्या परिसरातील प्रत्येकालाही समजावून सांगायचा प्रयत्न करा आणि यावेळी फटाक्यांपासून दूर रहावे अशी विनंती करा. या साथीच्या रोगात, हा विषारी वायू कोठेही होम क्वारंटाईनमध्ये राहणा-या रूग्णांसाठी अतिशय प्राणघातक ठरू शकतो. आपणा सर्वांनीसुद्धा प्रयत्न केले पाहिजेत की या वेळी आपण या विषारी धुरामुळे कोणत्याही जीवाला धोका होणार नाही. आपल्या स्वतःच्या शेजारी, शहरासाठी एक उत्कृष्ट काळजी असेल असा निश्चय करा.वरिष्ठ डॉक्टरांच्या अहवालानुसार कोरोना कालावधीत फटाक्यांचा धूर प्राणघातक आहे. दीपावलीमध्ये, आम्हाला शहर धुराने भरण्यापासून फटाक्यांच्या विषारी वायूपासून वाचवायचे आहे. आणि संघर्ष करीत असलेल्या किंवा कोरोनामुळे ग्रस्त झालेल्या रुग्णांना वाचवण्यासाठी देखील. आपणा सर्वांना निवेदन आहे की कृपया या वर्षी फटाके फोडू नका. सवयभान. मीच माझ्या सातारकरांचा रक्षक, असे आवाहन करण्यात आले आहे.