अरविंद केजरीवाल सरकारचा निर्णय
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
दिल्लीतील अरविंद केजरीवाल सरकारने दिवाळी सणादरम्यान फटाक्मयांची साठवणूक, विक्री आणि फोडण्यावर बंदी घातली आहे. वाढत्या प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर दिल्ली सरकारने हा निर्णय घेतला आहे. गेल्यावषी दिल्लीत फटाके फोडण्यावर बंदी घातल्यामुळे प्रदूषण पातळीत घट झाली होती. साहजिकच यंदाही बंदी घातल्यामुळे दिल्लीत दिवाळीमध्ये फटाक्मयांची आतषबाजी दिसणार नाही.
लोकांचा जीव वाचविण्यासाठी आणि दिल्लीतील प्रदूषणाची स्थिती पाहता यंदाही गेल्यावषीप्रमाणे सर्व प्रकारच्या फटाक्मयांची साठवणूक, विक्री आणि वापरावर बंदी घालण्यात येत आहे, असे ट्विट दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केले आहे. तसेच व्यापाऱयांना फटाक्मयांची साठवणूक न करण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे. गेल्यावषी साठवणूक केल्याने व्यापाऱयांचे नुकसान झाले होते, त्यामुळे यंदा कोणत्याही प्रकारच्या फटाक्मयांची साठवणूक करू नका, असेही केजरीवाल यांनी म्हटले आहे.