ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
देशात कोरोना व्हायरस धुमाकूळ घालत आहे. त्यामुळे देशात लॉक डाऊन जारी करण्यात आले आहे. लॉक डाऊनमुळे देशात होणाऱ्या अपराधाची संख्या कमी झाली आहे. मात्र, या काळात इंटरनेटचा उपयोग वाढल्याने सायबर गुन्ह्यात वेगाने वाढ झाली आहे.
देशाची राजधानी असलेल्या दिल्लीमध्ये मागील दोन महिन्यात सायबर गुन्ह्यांची संख्या 20 ते 25 टक्क्यांनी वाढली आहे. दोन महिन्यात दिल्लीत 1,345 गुन्ह्यांची नोंद झाली आहे. 2019 मध्ये याच काळात गुन्ह्यांची संख्या 859 इतकी होती.
यावर्षी वाढलेल्या गुन्ह्यांमध्ये अधिकतर प्रकरणे ही बँक खात्यांमधील देवाण-घेवाण, बनावट ई-कॉमर्स वेबसाइट बनवून केलेली फसवणूक, खाते धारकांच्या परवानगीशिवाय त्यांच्या खात्यातून पैसे काढणे या बरोबरच हॅकिंग आणि सोशल मीडियाशी संबंधित प्रकरणे देखील आहेत. यामध्ये महिला आणि तरुणींना मोठ्या प्रमाणात लक्ष केलेले समोर आले आहे.