ऑनलाइन टीम / नवी दिल्ली :
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दिल्ली सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे आता सर्व युनिव्हर्सिटीच्या सर्व परीक्षा रद्द करण्याची घोषणा उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी केली आहे.
ते म्हणाले, यामध्ये अंतिम वर्षाच्या परीक्षांचा देखील समावेश आहे. विद्यार्थ्यांना डिग्री त्यांच्या गेल्या वर्षीच्या गुणांवरून दिली जाणार आहे. पुढे ते म्हणाले, मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी देखील केंद्र सरकारला पत्र लिहून सर्व विद्यालयांच्या परीक्षा रद्द करण्याचे निवेदन दिले आहे.
दिल्ली सरकारच्या अंतर्गत येणाऱ्या विद्यापीठामध्ये आईपी युनिव्हर्सिटी, आंबेडकर युनिव्हर्सिटी, डीटीयू व अन्य सर्वांच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत. दिल्ली सरकारच्या विद्यापीठांबाबत बोलायचे झाले तर, याअंतर्गत येणाऱ्या दिल्ली सरकारच्या कॉलेजांबाबातचा निर्णय केंद्र सरकला घ्यावा लागेल.
दिल्ली युनिव्हर्सिटीची अशी 12 विद्यापीठे आहेत ज्यांना दिल्ली सरकार शंभर टक्के फंड देते आणि 16 अशी विद्यापीठे आहेत ज्यांना दिल्ली सरकार पाच टक्के फंड देते. परंतू दिल्ली युनिव्हर्सिटी हे केंद्रीय विद्यापीठ आहे. त्यामुळे या सर्वांचा निर्णय केंद्र सरकारला घ्यावा लागेल.
दिल्ली सरकारच्या मते, जे सेमिस्टर शिकवलेच नाही त्याची परीक्षा घेणे योग्य नाही. याआधीही सिसोदिया यांनी सांगितले होते की, सध्या सर्वत्र कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुळे असे निर्णय घेणे गरजेचे आहे. तसेच आपली पहिली प्राथमिकता सर्वांचे प्राण वाचवणे ही असली पाहिजे.