प्रतिनिधी / बेळगाव
लोकसभा पोटनिवडणुकीमध्ये मतदान करावे यासाठी गेल्या काही दिवसांपासून जनजागृती करण्यात येत आहे. सरकारी विभागातर्फे ही जनजागृती करण्यात येत आहे. गुरुवारी जिल्हा स्वीप समिती आणि दिव्यांग यांच्या संयोजनातून ही जनजागृती करण्यात आली.
जिल्हाधिकारी कार्यालयातून रॅलीला सुरुवात झाली. मतदानाचा हक्क प्रत्येकाने बजावावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले. प्रत्येक नागरिकांनी मतदानाची जबाबदारी घ्यावी आणि लोकशाही बळकट करावी, असा नारा देण्यात आला. जिल्हाधिकारी डॉ. के. हरिषकुमार, जिल्हा स्वीप समितीचे अध्यक्ष आणि जिल्हा पंचायतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी दर्शन एच. व्ही. यांनी ध्वज दाखवून रॅलीला चालना दिली. या रॅलीमध्ये दिव्यांग व्यक्ती दुचाकीसह सहभागी झाल्या होत्या. यावेळी मतदान जागृतीसाठी जोरदार घोषणा देण्यात आल्या.