महाराष्ट्राच्या राजकारणात राजकारण करताना एका मर्यादेपलिकडे जायचे असा अलिखित नियम राजकारणात होता, मात्र गेल्या काही दिवसापांसून षडयंत्र आणि गौप्यस्फोट हे महाराष्ट्राच्या राजकारणातील परवलीचे शब्द बनले असून केंद्रातील तपास यंत्रणा आणि
बॉलिवुडमधील नेते या सगळ्याच्या केंद्रस्थानी आले आहेत, त्यातच मुंबई आणि महाराष्ट्राला बदनाम करण्याचे षडयंत्र भाजप करत असल्याचे आरोप राज्यातील महाविकास आघाडीतील नेते करत आहेत. गेल्या 15 दिवसात क्रुझ ड्रग्ज पार्टीवर एनसीबीने घातलेली धाड या विषयाभोवती राज्याचे राजकारण सध्या ढवळून निघत आहे. राजकारण ही पण एक नशा असते मात्र या नशेने आता सगळय़ांनाच हँगओव्हर झाला आहे.भुल दिल्याशिवाय ऑपरेशन आणि दिशाभुल केल्याशिवाय राजकारण करता येत नाही मात्र आता राजकारणच भुल देणाऱया अंमली पदार्थाभोवती फिरत आहे.
राज्यात महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत आल्यापासुन भाजपकडून या सरकारला त्यातच शिवसेनेला टोकाचा विरोध होताना दिसतो, महाविकास आघाडी सरकारला आता दोन वर्ष पूर्ण होतील मात्र या दोन वर्षात सरकारमधील दोन पॅबिनेट मंत्री घरी गेले असून अनेक मंत्र्यांवर भाजपकडून भ्रष्टाचाराचे तसेच बेहीशोबी मालमत्ता असे आरोप केले गेले, त्यातच भाजपकडून शिवसेनेला लक्ष्य केले जात आहे. नुकत्याच झालेल्या शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी थेट केंद्र सरकारच्या विरोधातच हल्लाबोल करताना सरकार पाडूनच दाखवा असे आव्हान भाजपला दिले. गेल्या पंधरा दिवसात क्रुझ ड्रग्ज पार्टीवर एनसीबीने घातलेली धाड ही वादाच्या भोवऱयात आली असून या धाडीवरुन राज्याच्या राजकारणात रोज नवनवीन गौप्यस्फोट केले जात आहेत. या पार्टीत सहभागी असलेला आणि सध्या तुरूंगात असलेला बॉलिवुड अभिनेता शाहरूख खान याचा मुलगा आर्यन खान यांच्या सुटकेसाठी 25 कोटी रुपयाची मागणी करण्यात आल्याची माहिती या प्रकरणातील फरार पंच किरण गोसावी याचा
बॉडीगार्ड प्रभाकर साईल यांनी देताना एक व्हिडीओ व्हायरल केला आहे. त्यामुळे आता राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे, तर यापूर्वीच राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी भाजप, एनसीबी आणि काही गुन्हेगार मिळून या मुंबईत दहशत माजवत असल्याचा आरोप केला होता. हा आरोप करतानाच समीर वानखेडे यांचा मोबाईल व व्हॉटसऍप चॅट चेक करा. फोन
रेकॉर्डिंग जर रिलीज झाले तर सर्व केस कशा बोगस आहेत. मुंबईत जो फर्जीवाडा केलाय तो समोर येईल अशी मागणीही मलिक यांनी केली होती. आता या प्रकरणात प्रभाकर साईलने गौप्यस्फोट केल्यानंतर एनसीबीच्या अडचणीत वाढ झाली असून महाराष्ट्राची बदनामी करण्याचा हा कट असल्याचा आरोप महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून केला जात आहे. राज्याच्या राजकारणात यापूर्वी अनेक नेत्यांवर आरोप प्रत्यारोप झाले,मात्र राजकारणातील पातळी इतकी खाली गेल्याचे कधी बघायला मिळाली नाही. केंद्रातील तपास यंत्रणाच्या माध्यमातून रोज काही ना काही निमित्ताने छापे घातले जात आहेत. पूर्वी सरकार कधी पडणार असे भाकित करणारे भाजप नेते आता एनसीबी, सीबीआय तसेच इडीच्या रडारवर कोण असणार याची यादीच वाचुन आधीच मोठ मोठे गौप्यस्फोट करत आहेत. राज्याच्या राजकारणात राज्यव्यापी मुद्दा अनेक भ्रष्टाचार, गैरव्यवहार प्रकरणे गाजली, त्यात माजी मुख्यमंत्री बॅ.अंतुले यांना पायउतार व्हावं लागलं होतं. मात्र आता अंमली पदार्थावरुन राज्यातील राजकारण अंमल झाल्याचे बघायला मिळत आहे. एकमेकांवर कुरघोडी करायची शह कटशहचे राजकारण करताना गेल्या काही दिवसात अनेक पोलस अधिकाऱयांचा बळी गेला आहे. मुंबई माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग आणि राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख हे फरार असल्याच्या बातम्या येतात. पोलीस आणि गृहमंत्र्यांवर जर अशी वेळ येत असेल तर नेमके राजकारण कोणत्या दिशेने चालले आहे हा सवाल उपस्थित होतो. काही दिवसापूर्वी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी सध्याच्या राजकारणाबद्दल भाष्य करताना आता राजकारणात सभ्यपणा राहीला नसून कोथळा काढण्याची भाषा केली जात असल्याची खंत व्यक्त केली होती. आमदारांचे निधन झाल्यानंतर त्या रीक्त जागी होणारी पोटनिवडणूक ही सहनुभुती म्हणून बिनविरोध केली जात असे, मात्र आता आता देगलुर विधानसभा पोटनिवडणुकीचा प्रचार शिगेला पोहचला असून भाजपने शिवसेनेच्या नेत्यालाच उमेदवारी दिली आहे. गेल्या काही महिन्यापूर्वी पंढरपुर पोटनिवडणूकीतही भाजपने आयात उमेदवाराला उमेदवारी दिली होती. आता पोटनिवडणूकाही विधानसभा निवडणूकांप्रमाणे प्रतिष्ठेच्या होत आहेत. सध्याच्या राज्यकर्त्यांचा उद्देश हा सत्ता टिकवणे आणि सरकार अस्थिर करणे हाच असल्याने सत्ताधारी आणि विरोधीपक्ष यांच्यातील समन्वय कमी होऊन त्यांच्यातील दरी अधिकच रूंदावत आहे. त्यातून कुरघोडी आणि सुडबुध्दीच्या राजकारणाचा फटका हा सर्वसामान्य लोकांना बसत आहे. गेल्या 15 दिवसात केवळ सरकारमधील सर्वच पक्षाचे नेते हे आर्यन खान प्रकरणावर बोलत आहेत. कालच झालेल्या आरोग्य विभागाच्या परीक्षांमध्ये मोठा घोळ झाला. सरकारी नोकरीची आस लावून बसलेल्या ग्रामीण भागातील शेतकऱयांच्या मुलांना कोण वाली ? सरकारने गेल्या 5 महिन्यापासून श्रावण बाळ वफद्धापकाळ योजना, संजय गांधी निराधार योजनेचा निधी वितरित केला नाही. त्यामुळे महाराष्ट्रातील वफद्ध, निराधार, दिव्यांग, परित्यक्ता, विधवा, दुर्धर आजारी, अनाथ या सगळ्या पिडीतांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे. आर्यन खान आणि अनन्या पांडे यांच्या कर्तृत्वाचा पाढा वाचण्यात सगळी दिल्लीपासून मुंबईची यंत्रणा कामाला लागली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील एक राजकीय संस्कृती गनिमा आहे ती जर खालावली तर राज्य भरकटल्याशिवाय राहणार नाही.
प्रवीण काळे