अचूक बातमी “तरुण भारत”ची, सोमवार 29 नोव्हेंबर 2021, स. 11.15
● रविवारी रात्री अहवालात 14 बाधित
● एकूण 1,594 नागरिकांची तपासणी
● शाळा सुरू करण्याबाबत संभ्रम
● पालकांकडूनही प्रतिसाद नाही
● वाटचाल कोरोनामुक्तीच्या दिशेने
सातारा / प्रतिनिधी :
संपूर्ण नोव्हेंबर महिना सातारा जिल्ह्यासाठी मोठा दिलासादायक ठरलेला आहे. गेली अनेक महिने कोरोना संसर्गाच्या भीतीखाली काढलेल्या नागरिकांना सध्या मंदावत असलेली बाधित वाढ सुखावह वाटत आहे. शनिवारी अहवालात फक्त 17 नवीन बाधित समोर आले त्यानंतर रविवारी रात्रीच्या अहवालात देखील सलग दुसऱ्या दिवशी बाधित वाढ 20 च्या खाली राहिलेली असून, फक्त 14 जणांचा अहवाल बाधित आलेला आहे.
रविवारी अहवालात फक्त 14 बाधित
नोव्हेंबर महिन्यात अनेक वेळा बाधित वाढीचा आलेख 20 च्या खाली घसरलाही होता. मात्र त्यानंतर तो 20 ते 30 दरम्यान स्थिर राहत असताना गेल्या दोन तीन दिवसात देतो वीस ते पंचवीस दरम्यान स्थिर होता. शनिवारी व रविवारी या अहवालात सलग दोन दिवस वाढ 20 च्या खाली राहिलेली आहे. रविवारी फक्त चौदा जणांचा अहवाल बाधित आलेला असून यामध्ये एकूण 1,594 जणांची तपासणी करण्यात आलेली आहे यामुळे जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी जाण्याचा आले काही एक टक्के च्या खाली घसरलेला आहे.
आता नवीन व्हेरीएंटच्या चर्चेने संभ्रम
बाधित वाढीचा आलेख शुन्याकडे जात असताना आता तिसऱ्या लाटेचा धोकाही संपलेला असल्याने जगरहाटी निर्भयपणे सुरू झालेली आहे. तेवढ्यातच गेल्या चार पाच दिवसापासून नवीन व्हेरीएंटची चर्चा चर्चा झडू लागलेली पुन्हा वातावरण त्यांनी होत आहे. मात्र नागरिकांनी काळजी घेतल्यास हा नवीन कोरोनाचा ‘ओमीक्रोन’ व्हेरीएंट जिल्ह्यात फिरकणार नाही अशी स्थिती आहे. ज्या पद्धतीने तिसऱ्या लाटेची चर्चा विरलेली असताना या नवीन चर्चेने मात्र नागरिकांच्या मध्ये संभ्रम निर्माण होत आहे.
पहिली ते चौथी शाळा नका सुरू करू
राज्य शासनाने 1 डिसेंबर पासून पहिली ते चौथी शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र हे करताना पालकांकडून हमीपत्र लिहून घेण्यात येत आहे. यामध्येच कोरोनाच्या नवीन व्हेरीएंटची चर्चा झडू लागल्याने पहिली ते चौथी मधील विद्यार्थ्यांच्या पालकांचा सुर बदलू लागला आहे. नेमकं काहीच माहीत नसताना छोट्या मुलांची रिस्क कशाला घ्यायची उद्या काय घडल तर शाळा खर्च उचलणार का..किंवा शिक्षण मंत्री खर्च किंवा नुकसान भरून देणार का ? असा सवाल आता पालक करत आहेत.
प्रायव्हेट संस्था चालवण्यासाठी खटाटोप
कोरोना संसर्गाच्या युद्धात दोन लाटांच्या तडाख्याने मोठे फटके अनेक कुटुंबांना बसले आहेत. त्याची झळ ज्यांना फटका बसला नाही त्यांना कळणार नाही. त्यामुळे राज्य शासनाने केवळ प्रायव्हेट संस्था चालवण्याचा खटाटोप करण्यासाठी पहिली ते चौथीचे वर्ग सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र या छोट्या मुलांना नियम पाळणे शक्य होणार नाही. शिवाय एका भीतीच्या दडपणाखाली ही मुले शाळेमध्ये गेली तर त्याचा विपरीत परिणाम होऊ शकतो. त्यामुळे दोन तीन महिन्यासाठी पहिली ते चौथी शाळा सुरू करण्यापेक्षा त्यांचे ऑनलाईन शिक्षण सुरू ठेवावे व जानेवारीपासून स्थिती पाहून पुढील निर्णय सगळ्यांना घ्यावा लागेल, असेही मत काही पालक व्यक्त करत आहेत. लहान मुलांची मानसिकता,आणि त्यांना वाटणारी भीती याचा विचार बहुतेक शिक्षण मंत्री करत नसल्याचे दिसत आहे.
रविवारपर्यंत जिल्हय़ात
एकूण नमुने 22,97,291
एकूण बाधित 2,51,840
कोरोनामुक्त 2,44,452
एकूण मृत्यू 6,476
सक्रीय रुग्ण 228
रविवारी जिल्हय़ात
बाधित 17
कोरोनामुक्त 38
मृत्यू 00