वृत्तसंस्था/ नवी दिल्ली :
कोविड 19च्या धास्तीमुळे विविध कंपन्यांचे व्यवहार ठप्प झाले आहेत. यामुळे मिळेल त्या मार्गाने आर्थिक मार्ग धुंडाळण्यासाठी सध्या प्रयत्न करण्यात येत आहेत. यात आता दूरसंचार कंपन्यांनी बुधवारी आपला 35,000 कोटी रुपयांच्या वस्तू व सेवा कर (जीएसटी) परताव्याची मागणी केली आहे. याव्यतिरिक्त सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांकडून विविध प्रकारच्या ऑपरेटरांकडून 20,000 कोटी रुपयांची थकबाकी लवकरच प्राप्त करण्यासाठी मागणी करण्यात येणार असल्याची माहिती आहे.
ऑपरेटरांकडून दिलेल्या माहितीनुसार अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सूक्ष्म, लघु आणि मध्यम क्षेत्रासाठी नवीन प्रोत्साहनपर आर्थिक निधीची घोषणा केली असल्यामुळे सदरची थकबाकी आगामी 45 दिवसांमध्ये निपटण्याचे आश्वासन दिले आहे.