वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
कोरोना महामारीच्या दरम्यान भारतीय तंत्रज्ञान क्षेत्राने वर्षाच्या आधारे 2.3 टक्क्यांची वाढ प्राप्त केली आहे, अशी माहिती नेसकॉपच्या अहवालानुसार सांगण्यात आली आहे. यामध्ये आर्थिक वर्ष 2020-21 मध्ये डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन आणि टेक ऍडॉप्शनमध्ये तेजीचे वातावरण राहिले आहे.
याच दरम्यान सदरच्या क्षेत्रात जवळपास 14.13 लाख कोटी रुपयांचा महसूल प्राप्त झाला आहे. आर्थिक वर्ष 2020-21 च्या दरम्यान 138000 नवीन हायरिंग करण्यात आली आहे. यामध्ये या क्षेत्रातील कर्मचाऱयांची संख्या वाढून 44.70 लाख झाली आहे.
देशातील बाजारात 3.4 टक्क्यांची वाढ
तंत्रज्ञान उद्योगात डिजिटल इन्वेस्टमेंट सादर करण्यात आले आहे. ऑर्गनायझेशनच्या सध्याच्या क्षमतांमध्ये बिजनेस मॉडेलच्या हिशोबाने 28 ते 30 टक्क्यांचा महसूल प्राप्त केलेला आहे. हार्डवेअरच्या मागणीमधून इंडियन डोमेस्टिक मार्केटला मागील वर्षात 3.4 टक्क्यांची वाढ प्राप्त झाली आहे. भारतीय कंपन्यांचे ध्येय हे सध्या इनोवेटीव्ह प्रोडक्ट्सवर काम करत आहे. मागील पाच वर्षांमध्ये या कंपन्यांनी 115,000 पेक्षा अधिकचे टेक पेटंट प्राप्त केले आहेत.