चालू महिन्यात 22 मेपर्यंत 9,089 कोटींचा व्यवहार
वृत्तसंस्था/ मुंबई
मागील दोन महिन्यापासून विदेशातील गुंतवणूकदार पळ काढत होते. परंतु ते आता नक्याने भारतामध्ये गुंतवणूक करण्यासाठी परतत आहेत. गुंतवणूकदारांच्या आकडेवारीनुसार, 22 मेपर्यंत त्यांनी भारतीय शेअर बाजारामध्ये 9,089 कोटी रुपयांची निक्वळ खरेदी केली आहे.
या अगोदर एप्रिलमध्ये विदेशी पोर्टफोलियोच्या गुंतवणूकदारांनी (एफपीआय) भारतीय बाजारामधील 6,883 कोटी रुपयांची निव्वळ विक्री केली होती. याच्याही अगोदर मार्चमध्ये 61,973 कोटी रुपयांच्या समभागांची निक्वळ विक्री केली आहे. विदेशी गुंतवणूकदारांनी डेट बाजारामध्ये 21,418 कोटी रुपयांची निव्वळ विक्री केली आहे तर फेब्रुवारीमध्ये एफपीआयने भारतीय शेअर बाजारामध्ये 1,820 कोटी रुपयापेक्षा अधिकचे समभाग खरेदी केले आहेत.
चालू महिन्यात एफपीआय काही भारतीय समभागांना आकर्षक मानली जात आहे. या महिन्यातील जास्तीत जास्त खरेदीच्या कारणामुळे 7 मे रोजी हिंदुस्थान युनिलिव्हर कंपनीने 25 हजार कोटी रुपयांच्या ब्लॉक व्यवहाराच्या माध्यमातून भागीदारी केली आहे, असे आशिका स्टॉक ब्रोकिंगचे संशोधक प्रमुख आशुतोष मिश्रा यांनी म्हटले आहे.
मे महिन्यातील समभाग खरेदी
मे महिन्यात 1 ते 22 तारखेपर्यंत एफपीआयमधील 9,089 कोटी रुपयांची निव्वळ खरेदी केली असून, डेट बाजारामध्ये 21,418 कोटी रुपयांची निव्वळ विक्री केली आहे.