ऑनलाईन टीम / मुंबई :
भारतात आतापर्यंत 5 हजार 394 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. एकूण मृतांपैकी 94 टक्के मृत्यू हे केवळ 8 राज्यात आहेत. त्यामध्ये महाराष्ट्रातील संख्या सर्वाधिक आहे.
देशभरातील 5 हजार 394 मृतांपैकी महाराष्ट्रात सर्वाधिक 2 हजार 286 आणि गुजरातमध्ये 1 हजार 38 असे 3 हजार 324 मृत्यू आहेत. म्हणजेच 61.62 टक्के बळी हे फक्त महाराष्ट्र आणि गुजरात या दोन राज्यात आहेत. तर दिल्ली 473, मध्यप्रदेश 350, पश्चिम बंगाल 317, उत्तरप्रदेश 213, राजस्थान 194 आणि तामिळनाडूत 173 बळी गेले आहेत.
एकूण बळींपैकी 5044 मृत्यू महाराष्ट्र, गुजरात, तामिळनाडू, मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश, दिल्ली, पश्चिम बंगाल आणि राजस्थानमध्ये आहेत. म्हणजेच देशातील 93.51 % मृत्यू हे या आठ राज्यात झाले आहेत. त्यामध्ये महाराष्ट्राचा वाटा 42.38 टक्के आहे.