सॅमसंग, शाओमी-रियलमीसह अन्य ब्रँडचे प्रकल्प बंदच
नवी दिल्ली :
संपूर्ण देशात मागील महिन्यापासून लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. यामुळे विविध प्ररकारच्या उत्पादनांचे प्रकल्प बंद आहेत. यामुळे साहजिकच त्या सर्वाचा परिणाम खरेदी विक्रीवर होतो आहे. यातील सर्वाधिक चर्चेत असणारे व जीवनाचा अभिवाज्य घटक बनलेला घटक म्हणजे स्मार्टफोनची विक्री संपूर्ण देशात गेल्या एप्रिल महिन्यात शुन्यावर आली आहे.
सदर कालावधीत स्मार्टफोनची निर्मिती करणारे प्रकल्पच लॉकडाऊनची घोषणेच्या अगोदरच बंद केले आहेत. तर आगामी काळात लॉकडाऊन समाप्त झाल्यानंतरही ही स्थिती सामान्य होण्यासाठी आणखीन तीन चार आठवडय़ांची आवश्यकता निर्माण होणार असल्याचे स्मार्टफोन कंपन्यांनी म्हटले आहे. तर उपलब्ध अहवालानुसार मार्च महिन्यात स्मार्टफोन शिपमेंटमध्ये 19 टक्क्मयांनी घसरण झाल्याचे पहावयास मिळाले आहे.
लॉकडाऊच्या घोषणेनंतर सर्व मोबाईल उत्पादन व अन्य प्रकल्प बंद करण्यात आले होते. या कारणामुळे विविध नवीन मॉडेलचे लाँचिंगही थांबविण्यात आले असल्याचे रियलमी इंडियाचे प्रमुख माधव सेठ यांनी यावेळी सांगितले आहे.
विक्रीच्या समस्या
काउंटरपाँईट रिसर्चचे असोसिएट संचालक तरुण पाठक यांनी म्हटलले आहे, की लॉकडाऊमुळे कारखाने आणि किरकोळा विक्रीची दुकाने बंद आहेत. दुसऱया बाजूला ऑनलाईन मार्गांचा वापर करुन जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करण्याला सरकारने मुभा दिली असल्याने अन्य साहित्यांचा पुरवठा करण्यावर मर्यादा येत बंद असल्याचा फटकाही स्मार्टफोन विक्रीला बसत असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले आहे.