ऑनलाइन टीम / नवी दिल्ली :
देशातील कोरोनाच्या रुग्णांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असल्याचे चित्र आहे. गेल्या 24 तासात कोरोनाच्या 1 हजार 396 रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे देशातील कोरोना रुग्णांची संख्या 27 हजार 892 पोहचली आहे. एकूण मृतांचा आकडा 872 वर पोहचला असून, गेल्या 24 तासात 380 रुग्ण बरे झाले आहेत. तर आत्तापर्यंत 6 हजार 184 रुग्ण बरे झाले आहेत, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव आणि प्रवक्ते लव अग्रवाल यांनी आज दिली.
ते म्हणाले, कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 22 टक्के आहे. देशातील सोळा जिल्ह्यांमध्ये मागील 28 दिवसात एकही कोरोनाचा रुग्ण आढळला नाही आहे. आपली लढाई रोगाशी आहे रुग्णांची नाही. त्यामुळे रुग्णांना साथ द्या आणि सहकार्य करा. तसेच पोलीस, डॉक्टर यांच्यावर हल्ले करू नका. असं ही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
महाराष्ट्रात इंटर मिनिस्टरियल सेंटरच्या पथकाने दौरा केला. यानुसार, पुण्यात कोरोना वाढीचे प्रमाण दुप्पट झाले आहे. याबाबत केंद्रीय पथकाची महाराष्ट्र सरकारशी चर्चा सुरू असून पुण्यात टेस्टिंग ला प्राधान्य देण्याच्या सूचना कारण्यात आली आहे. असे गृह मंत्रालयाकडून सांगण्यात आले.
रॅपिड अँटी बॉडी टेस्ट संदर्भात राज्यांसाठी नवीन सल्लाहागार जारी केला आहे. ग्वांझू वोंडफो बायोटेक आणि झुहाई लीवजॉन डायग्नोसिट्क्स चे किट न वापरण्याचा सल्ला यावेळी आयसीएमआर च्या प्रवक्त्यांनी दिला आहे.