392 मृत्यू- चोवीस तासात साडेबारा हजारांहून अधिक रुग्णांना डिस्चार्ज
नवी दिल्ली –
देशात जीवघेण्या कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव अद्याप कायम आहे. गेल्या काही दिवसात कोरोनाच्या नव्या आकडेवारीत घट होताना दिसत आहे. गेल्या 24 तासात कोरोनाचे 10 हजार 923 नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. याचदरम्यान 392 जणांचा मृत्यू झाला आहे. देशात गेल्या 24 तासांत 12 हजार 509 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर सक्रिय रुग्णांच्या आकडेवारीत घट होत 1 लाख 46 हजार 950 वर आली आहे.
केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, देशात आतापर्यंत एकूण 4 लाख 60 हजार 265 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. देशात आतापर्यंत 3 कोटी 37 लाख 37 हजार 468 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तथापि, आतापर्यंत बाधित झालेल्यांचा एकूण आकडा 3 कोटी 43 लाख 44 हजार 683 वर पोहोचला आहे. तसेच केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या वतीने जारी करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार, देशात शुक्रवारी कोरोनाच्या 20 लाख 15 हजार 942 लसीचे डोस देण्यात आले आहेत. आतापर्यंत देशात 107 कोटी 70 लाख 46 हजार 116 जणांना लस देण्यात आली आहे.