ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
भारतात आतापर्यंत 2 कोटी 92 लाख 74 हजार 823 लोक कोरोनाच्या विळख्यात अडकले आहेत. त्यामधील 2 कोटी 77 लाख 90 हजार 073 रुग्ण पूर्णपणे बरे झाले असून, सध्या 11 लाख 21 हजार 671 रुग्ण उपचार घेत आहेत.
गुरुवारी देशात 91 हजार 702 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. तर 1 लाख 34 हजार 580 रुग्ण कोरोनामुक्त झाले. 3403 रुग्णांचा मृत्यू झाला असून, मृतांची एकूण संख्या 3 लाख 63 हजार 079 एवढी आहे. आतापर्यंत पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील 24 कोटी 60 लाख 85 हजार 649 जणांना लस देण्यात आली आहे.