ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
कोरोना संसर्ग दिवसेंदिवस वाढत असल्याने देशात 15 जूनपासून पुन्हा लॉकडाऊन सुरू होऊ शकतो, असे मेसेज सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. मात्र, या मेसेजमध्ये कोणतेही तथ्य नसल्याचे पीआयबी इंडियाने म्हटले आहे.
‘देशातील रेल्वे आणि विमानसेवा बंद करून 15 जूनपासून देशात पुन्हा लॉकडाऊन लागू केला जाऊ शकतो, असे गृहमंत्रालयाने सूचित केले आहे.’ असे मेसेज सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या मेसेजमुळे लोकांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. यावर पीआयबी इंडियाने ट्विट करून हे मेसेज खोटे असून, अशा प्रकारच्या दिशाभूल करणाऱ्या मेसेजपासून सावध राहण्याचे नागरिकांना आवाहन केले आहे.