9 लाख 88 हजार रुग्णांची कोरोनावर मात : अजूनही 5 लाख 9 हजार 447 सक्रिय रुग्ण
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
कोरोनाचा संसर्ग कमी होण्याची चिन्हे अजूनही दिसत नसून देशात एकूण बाधितांच्या आकडय़ाने 15 लाखांचा टप्पा पार केला आहे. बुधवारी कोविड-19 च्या 48 हजार 513 नवीन रुग्णांसह संक्रमित रुग्णांची संख्या 15 लाख 31 हजार 669 वर पोहोचली. संसर्गामुळे आणखी 768 रुग्णांचा मृत्यू झाल्याने मृतांची संख्या 34,193 वर पोहोचली आहे. तरीही बरे होणाऱया रुग्णांचे प्रमाणात वाढत असल्याने आतापर्यंत 9 लाख 88 हजार 29 रुग्णांनी कोरोनावर मात केल्याचे आकडेवारीतून दिसून येत आहे. दरम्यान, सध्या देशात 5 लाख 9 हजार 447 सक्रिय रुग्ण असल्याचेही स्पष्ट झाले आहे.
कोरोना विषाणूचा प्रसार भारतात आता वेगाने होत आहे. देशात आता कोरोना विषाणूच्या संसर्गाचीग्न दिवसभरात 45 हजारहून अधिक प्रकरणे समोर येत आहेत. एकंदर वाढीमध्ये गेल्या आठवडय़ाच्या तुलनेत या आठवडय़ात सुमारे 20 टक्क्मयांनी वाढ झाली आहे. आता कोरोना विषाणूच्या संसर्गाच्या बाबतीत भारत, अमेरिका आणि ब्राझीलच्या मागे आहे. ब्राझील आणि भारतामध्ये दर हजार लोकसंख्येवर सगळय़ात कमी चाचणी केली गेली आहे. भारतात प्रतिहजार लोकसंख्येच्या सुमारे 11.8 टक्के चाचण्या घेण्यात आल्या, तर ब्राझीलमध्ये 11.93 टक्के चाचण्या घेण्यात आल्या. तर अमेरिकेत दर हजार लोकसंख्येवर 152.98 चाचण्या घेण्यात येत आहेत.
भारतात मृत्यूचे प्रमाण कमी
18 जून रोजी कोविड-19 मुळे मृत्यूचे प्रमाण 3.33 टक्के होते, असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने म्हटले होते. आता ते 2.25 टक्क्मयांपर्यंत खाली आले आहे. तसेच रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही सुधारले आहे. केंद्र सरकार, राज्यांच्या सरकारांच्या मार्गदर्शनाखाली केंद्रशासित प्रदेशांनी गंभीर बाबींचा सामना करण्यासाठी प्रभावी पद्धती अवलंबल्या. आरोग्य क्षेत्रातील कामगारांचा वापर करुन जास्त धोका असलेल्या लोकांची काळजी घेण्याची पावले उचलली गेली. या सर्व प्रयत्नांमुळे देशातील कोविड -19 मुळे मृत्यूचे प्रमाण कमी होण्यास मदत झाली.
रिकव्हरी दर 64 टक्क्यांपेक्षा वर
रिकव्हरीचा दर जूनमध्ये सुमारे 53 टक्के होता. आता हा दर 64.51 टक्के झाला आहे. गेल्या 24 तासात 35,286 रुग्णांना डिस्चार्ज मिळाल्यानंतर देशात संसर्गातून बरे होणाऱयांची संख्या वाढून 9,88,029 इतकी झाली आहे. सलग सहाव्या दिवशी देशातील 30 हजारहून अधिक रुग्ण संसर्गातून मुक्त झाले आहे.
पावणेदोन कोटी तपासण्या पूर्ण
आतापर्यंत 1 कोटी 77 लाख 43 हजार 740 स्वॅबची तपासणी करण्यात आली आहे. देशात मंगळवारी एका दिवसात तब्बल 4 लाख 8 हजार 855 जणांची कोरोना चाचणी करण्यात आली असून त्यापैकी 48 हजार 513 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह मिळाले आहेत, अशी माहिती आयसीएमआरकडून देण्यात आली.
महाराष्ट्र, कर्नाटकात सर्वाधिक मृत्यू
देशात दिवसभरातील मृतांमध्ये महाराष्ट्र आघाडीवर असून मागील चोवीस तासात 282 मृत्यूंची नोंद झाली आहे. महाराष्ट्रापाठोपाठ कर्नाटक (102), तामिळनाडू (88), आंध्रप्रदेश (58), उत्तर प्रदेश (41), पश्चिम बंगाल (38) आणि दिल्लीत (28) मृत्यूंची नोंद झाली आहे.