ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
देशात मागील 24 तासात 3 लाख 49 हजार 691 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली. कोरोना महामारी सुरू झाल्यापासूनचा दैनंदिन रुग्णवाढीचा हा सर्वात मोठा आकडा आहे. परंतु, दिलासा देणारी बाब म्हणजे कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांचे प्रमाणदेखील वाढत आहे. शनिवारी 2 लाख 17 हजार 113 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर 2767 रुग्णांचा मृत्यू झाला.
देशात आतापर्यंत 1 कोटी 69 लाख 60 हजार 172 लोक कोरोनाच्या विळख्यात अडकले आहेत. त्यामधील 1 कोटी 40 लाख 85 हजार 110 रुग्ण या आजारातून बरे झाले आहेत. अजूनही 26 लाख 82 हजार 751 रुग्ण उपचार घेत असून, 1 लाख 92 हजार 311 रुग्ण दगावले आहेत. आतापर्यंत पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील 14 कोटी 09 लाख 16 हजार 417 जणांना लसीकरण करण्यात आले.
देशात आतापर्यंत 27 कोटी 79 लाख 18 हजार 810 नमुन्यांची तपासणी करण्यात आली. त्यामधील 17 लाख 19 हजार 588 कोरोना चाचण्या शनिवारी (दि.24) करण्यात आल्या.