विकासाकरिता तरतूद केलेला निधी वाया : फिरावयास येणाऱया नागरिकांना मोठी अडचण
प्रतिनिधी /बेळगाव
शहराच्या विकासाबरोबर उद्यानांच्या सुशोभिकरणाचा प्रयत्न महापालिकेने केला होता. उद्यानांच्या विकासाकरिता कोटय़वधी निधीची तरतूद केली होती. मात्र, उद्यानांची देखभाल करण्यात महापालिकेला अपयश आले आहे. द्वारकानगर, चौगुलेवाडी येथे असलेल्या उद्यानाची दुरवस्था झाली असून संपूर्ण उद्यान गवत, झाडाझुडुपांनी व्यापले आहे. यामुळे देखभालीकरिता मंजूर झालेला निधी कुठे गेला, असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे.
महापालिका व्याप्तीमध्ये सहाशेहून अधिक खुल्या जागा आहेत. यापैकी काही खुल्या जागा उद्यानांसाठी राखीव आहेत. काही जागा क्रीडांगणासाठी राखीव आहेत. पण राखीवतेनुसार जागांचा वापर केला जात नाही. कारण महापालिकेच्यावतीने उद्यानांच्या विकासाकरिता कोटय़वधी निधीची तरतूद केली होती. मात्र, निधीचा वापर करून कोणत्या उद्यानाचा विकास केला, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. सध्या शहरातील काही मोजकी उद्याने वगळता सर्वच उद्यानांची दुरवस्था झाली आहे. उद्यानांमध्ये गवत आणि झाडेझुडुपे वाढली असून सुशोभिकरणाऐवजी विद्रुपीकरण झाले आहे.
मनपा अधिकाऱयांनी काही मोजक्या उद्यानात शुशोभिकरण केले आहे. पण उद्यानांच्या देखरेखीबाबत जबाबदारी झटकली आहे. यामुळे नागरिकांतून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. काही उद्यानात विकासकामे केली. मात्र, बहुतांश उद्यानांच्या सुशोभिकरणाकडे दुर्लक्ष केले आहे. फिरावयास येणाऱया नागरिकांकरिता पदपथ तयार करण्यात आला. मात्र, गेल्या काही दिवसांपासून स्वच्छतेचे व देखभालीचे काम करण्यात आले नाही. यामुळे उद्यानात गवत आणि झाडे उगवून दुरवस्था झाली आहे.
गवतामुळे पहाटे आणि सायंकाळी फिरावयास येणाऱया नागरिकांना मोठी अडचण निर्माण झाली आहे. उद्यानातील गवतामुळे सापाकिडय़ांचा वावर वाढला आहे. लहान मुलांसाठी खेळाचे साहित्य बसविण्यात आले आहे. पण अशा उद्यानांमध्ये लहान मुलांना किंवा वृद्धांना जाणे धोकादायक बनले आहे. तरीदेखील महापालिकेच्या अधिकाऱयांनी याकडे साफ दुर्लक्ष केल्याची टीका नागरिक करीत आहेत.
उद्यानांच्या देखभालीकरिता तरतूद करण्यात आलेला निधी कुठे गेला, असा मुद्दा निर्माण झाला असून निधीचा गैरवापर होत आहे का? असा मुद्दा उपस्थित करण्यात येत आहे. काही मोजक्मयाच उद्यानांच्या देखभालीकरिता कामगारांची नियुक्ती करण्यात आली आहे. पण द्वारकानगर परिसरातील उद्यानांच्या देखभालीकरिता कामगारांची नियुक्ती करण्यात आली नसल्याने उद्यानांची दुरवस्था झाली आहे.