जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा व निवेदन
प्रतिनिधी/ बेळगाव
कर्नाटक राज्यात बकरी मोठय़ा प्रमाणात पाळली जातात. संपूर्ण देशामध्ये बकरी पाळण्यामध्ये या राज्याचा चौथा क्रमांक लागतो. धनगरच ही बकरी मोठय़ा प्रमाणात पाळतात. बऱयांचे पालन पोषण करुन त्यामधून आपला उदनिर्वाह करतात. मात्र बऱयाचवेळा बकऱयांचा अचानक मृत्यू होतो. त्यामुळे मोठा फटका बसत आहे. तेंव्हा तातडीने आर्थिक मदत करणे गरजेचे आहे. याचबरोबर मेंढपाळांना विशेष पॅकेज जाहीर करावे, अशी मागणी कर्नाटक सहकारी बकरी पालन फेडरेशनच्यावतीने जिल्हाधिकाऱयांकडे निवेदनाव्दारे करण्यात आली आहे.
कर्नाटक राज्यात 1 लाख 74 हजार कुटुंबे बकरी पालण क्यवसाय करतात. बकऱयांना बऱयाचवेळा साथीचे आजाराची लागण होते. त्यामुळे त्यांना वेळेत क्हॅक्सीनेशन देणे गरजेचे आहे. पशु वैद्यकीय विभागाने त्यासाठी नियोजन करावे, अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे. आंध्र, तेलंगणा, सरकारने 4 हजार कोटींचे अनुदान या समाजाला दिले आहे. त्याच प्रकारे कर्नाटकातील धनगर समाजाला अनुदान द्यावे, अशी मागणी करण्यात आली.
सध्या राज्यात 95 लाख 73 हजार बकरी आहेत.नुकतीच त्याबाबत गणती करण्यात आली आहे. त्या आकडेवारीनुसार हा आकडा बाहेर आला असून सरकारने याचाही विचार करणे गरजेचे आहे. प्रोत्साहन देण्यासाठी विशेष योजना लागू कराव्यात, अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे. यापूर्वी कोणत्याही आजारामुळे बकऱयांचा मृत्यू झाला तर नुकसान भरपाई मिळत होती. मात्र आता नुकसान भरपाई देणे बंद करण्यात आले आहे. तेंव्हा त्याचा गांभीर्याने विचार करुन नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी या निवेदनात करण्यात आली.
जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांना निवेदन देण्यात आले. यावेळी गजानन निंगाप्पा कळळी यांच्यासह धनगर समाजातील नागरिक मोठय़ा संख्येने उपस्थित होते.