अलीकडे ‘धर्म’ शब्दाचा संकुचित अर्थ घेतला जातो. त्यामुळे कुणाच्या भावनाही दुखावतात. परंतु प्राचीन संस्कृत वाङ्मयात बऱयाचदा आपल्याला व्यापक अर्थ पहायला मिळतो आणि तेव्हाचा धर्माविषयीचा दृष्टिकोन लक्षात येतो. संस्कृत भाषेतदेखील धर्माच्या वेगवेगळय़ा दृष्टिकोनातून व्याख्या केल्या आहेत. धर्मो रक्षति रक्षितः। असे एक सुवचन आहे. त्यातील मूळ श्लोक पुढीलप्रमाणे-
धर्म एव हतो हन्ति धर्म रक्षति रक्षितः।
तस्मात् धर्मं न त्यजामि मा नो धर्मो हतःअवधीत्।।
अर्थ-आपण धर्माची हत्या केली तर धर्मही आपली हत्या करतो. धर्माचे संरक्षण करतो. त्यामुळे मी धर्म (सदाचरण) सोडणार नाही. तसेच धर्माची हत्या करून त्याने आम्हाला मारावे अशी वेळ येऊ देणार नाही. येथे धर्म हा शब्द सदाचरण अशा अर्थी वापरला आहे. हा श्लोक महाभारतातील वनपर्वातला आहे. युधि÷िराने यक्षाच्या प्रश्नांना उत्तरे देताना हे सांगितले आहे. वनवासात असताना एकदा एका सरोवरावर पाणी आणण्यासाठी नकुल, सहदेवादि पांडव क्रमाक्रमाने गेले. पण तिथे यक्षाची परवानगी घेतली नाही. ते सरोवर यक्षाच्या मालकीचे होते. त्याने चार पांडवांना विविध प्रश्न विचारले, पण कुणालाही त्यांची बरोबर उत्तरे देता आली नाहीत. ते सारे पाणी आणायला गेले, पण तिथेच मरून पडले. ते का आले नाहीत, हे पाहण्यासाठी युधि÷िर गेला, तेव्हा त्यालाही यक्षाने विविध प्रश्न विचारले व त्यांची समर्पक उत्तरे युधि÷िराने दिल्याने यक्ष प्रसन्न झाला व त्याला वर मागण्यास सांगितले. तेव्हा युधि÷िराने ‘नकुल’ जिवंत व्हावा असे सांगितले. नकुल हा माद्रीचा पुत्र होता. तिच्यावर अन्याय होऊ नये म्हणून तिचा एक पुत्र जिवंत रहावा असे त्याने सांगितले. माद्री ही कुंतीप्रमाणेच माझी आई आहे. त्यामुळे अशी मागणी करून मी धर्माचे पालन करीत आहे. मी जर धर्माचे पालन केलेतर धर्मही माझे रक्षण करील! ह्या उत्तराने यक्षाने प्रसन्न होऊन सर्वच पांडवांना जिवंत केले.
धर्म म्हणजे नेमून दिलेले कर्तव्य व सदाचरण होय. त्यायोगेच व्यक्ती आणि धर्माची वृद्धी होत असते.
अहिंसा परमो धर्मः। असेही एक सुवचन आहे. म्हणजे हिंसा न करणे हा श्रे÷ धर्म होय. याच्या उलट अलीकडे आपल्याला माणसांचे वागणे दिसते. सत्यं वद।धर्मं चर। सत्य बोलावे आणि सद्धर्माचे आचरण करावे असे वेदांनीही सांगितले आहे. शेवटी माणसांनीच आपण कसे वागावे हे ठरवायचे आहे. पण सत्य, अहिंसा इ.मूल्यांचे पालन करणे म्हणजेच धर्म असे थोडक्मयात सांगता येईल. भारतीय संस्कृती अशा प्रकारे सत्यं, शिवं, सुंदरम्चा पुरस्कार करणारी आहे हेच यातले तात्पर्य आहे!….