प्रतिनिधी /निपाणी
कोरोनाचा तडाखा, लॉकडाऊनची प्रक्रिया, प्रशासकीय नियम, सामाजिक अंतर, बाजारपेठेतील नागरिकांचा संचार, पारंपरिक खेळांना सोसावा लागलेला मंदीचा फटका यात ‘सर्कस’ हा विषयच आता नामशेष होणार का?, प्रशासकीय नियमातील दुटप्पी धोरण आणि नागरिकांच्या बदलत चाललेल्या धोरणाचा फटका सर्कसच्या खेळांवर होत आहे. रसिक मायबापांच्या मनोरंजनासाठी उपाशी सामोरे जाताना होणारी कलाकारांची घालमेल आता सहन होत नाही. सुपरस्टार सर्कसचा देशभरात विविध ठिकाणी प्रवास झाला आहे. यात जवळपास 80 कलाकार कला सादर करत आहेत. मात्र सध्याच्या बिकट परिस्थितीत ‘बदलेल्या धोरणांच्या तडाख्याने कलाकारांच्या आयुष्याची सर्कस बनली’ असल्याची व्यथा व्यवस्थापक सलीम सय्यद यांनी ‘तरुण भारत’शी बोलताना व्यक्त केली.
बेळगाव जिल्हय़ात दोन वर्षांत विविध ठिकाणी सर्कसचे खेळ झाले. मात्र लॉकडाऊनच्या धोरणाचा फटका सोसावा लागत आहे. त्याचा फटका किती मोठय़ा प्रमाणात सहन करावा लागला आहे, याची जाणीव प्रशासनाला नाही. आम्हाला पैशांची नितांत गरज आहे. मात्र ती प्रामाणिक कला सादर केल्यानंतर मिळणाऱया प्रोत्साहनातून मिळावी, अशी अपेक्षा सय्यद यांची आहे.
‘तरुण भारत’च्या वृत्ताची दखल फेसबुक प्रेंड्स सर्कलने घेतली. सर्कलचे प्रमुख संतोष दरेकर, राहुल पाटील, व्हिक्टर फ्रान्सिस यांनी बेळगावमधून जाऊन सुमारे 15 हजाराचे साहित्य सुपूर्द केले.