नववी ते 12वी पर्यंतचे 1 लाख 61 हजार विद्यार्थ्यां येणार शाळेत : विद्यार्थ्यांना पालकांनी शाळेत पाठवण्याचे माध्यमिक शिक्षणाधिकारी राजेश क्षीरसागर यांचे आवाहन
प्रतिनिधी / सातारा
कधी नव्हे ते प्रथमच शाळा, कॉलेज कॉलेजला अचानक मार्च महिन्यात सुट्टय़ा घोषित झाल्या ते कोरोनामुळे. जिह्यातील सर्वच शाळा राज्य शासनाच्या निर्णयामुळे बंद ठेवण्यात आल्या. दहावीची परीक्षा संपत आली होती. अन् तेवढय़ात कोरोनाचा कहर सुरु असताना काळजी म्हणून शाळा बंद ठेवण्यात आल्या. आता थोडासा कोरोनाचा कहर कमी होत असताना राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयानुसार उद्यापासून जिह्यातील शाळा सुरु होणार आहेत. सर्व काळजी शाळा व्यवस्थापनांकडून घेण्यात येणार आहे, पालकांनी आपली मुले शाळेत पाठवावीत, असे आवाहन माध्यमिकचे शिक्षणाधिकारी राजेश क्षीरसागर यांनी केले आहे.
कोरोनाचा विळखा जगाला पडला आहे. तो विळखा सातारा जिह्यात मार्च महिन्यापासून आहेत. सरकारच्या धोरणानुसारच त्यावेळी शाळा, कॉलेजला कुलूप लागले होते. तेव्हापासून शाळा, कॉलेज बंद ठेवण्यात आलेले आहेत. सध्या राज्य शासनाच्या निर्णयानुसार सोमवारपासून इयत्ता 9 वी ते 12वी पर्यंतचे वर्ग सुरु करण्याचे निर्देश दिले गेले आहेत. त्यामुळे शाळेतील शिक्षकांच्या कोरोना चाचण्या करुन घेण्यात आल्या आहेत. शाळां, कॉलेजचा परिसर निर्जुतक करुन घेण्यात आला आहे. शिक्षकांचीही चाचणी करुन घेण्यात आली आहे. इयत्ता 9वी ते 12 वीपर्यंतचे जिह्यात 1 लाख 61 विद्यार्थी आहेत. पालकांनी शाळेत पाठवावे, असे आवाहन माध्यमिकचे शिक्षणाधिकारी राजेश क्षीरसागर यांनी केले आहे.