प्रतिनिधी/ रत्नागिरी
रत्नागिरीतील पारंपारिक लोककला असलेल्या ‘नमन’ मंडळांचे संघटन करून त्यांना उभारी देण्यासाठी प्रथमच ‘कोकण नमन कलामंच, रत्नागिरीची स्थापना करण्यात आली आहे. ‘नमन’ या कलेला, त्यातील कलाकारांना राजाश्रय मिळावा, त्यातील कलावंताच्या समस्यांची पूर्तता व्हावी यासाठी ही संघटना सदैव प्रयत्नशील राहणार आहे.
सन 2019-20 या वर्षातील जागतिक कोरोना महामारीमुळे उदभवलेल्या लॉक डाऊन काळात नमन मंडळांवर आर्थिक अरिष्ट कोसळले. मंडळांना कुठेही कला सादर करणेची मुभा नव्हती. त्यामुळे नमन कार्यक्रमांच्या ठरलेल्या ऑडर्स ही रदद कराव्या लागल्या. परिणामी नमन मंडळांना आर्थिक समस्येला सामोरे जावे लागल.s अशा या कठीण परिस्थितीत धडपडणाऱया नमन मंडळांच्या संघटनाचा विषय प्रकर्षाने पुढे आला. त्यासाठी खेडशी येथील श्रीधर खापरे व टिके येथील प्रभाकर कांबळे यांनी नमन मंडळांना उद्भवणाऱया प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी त्यांचे संघटन व्हावे अशी संकल्पना मांडली. त्यातून या कलेला नवी उभारी देण्यासाठी कोकण नमन कलामंच या संघटनेची स्थापना करण्यात आली आहे.
या कलेला राजाश्रय मिळावा या मागणीसाठी आतापर्यंत 127 नमन मंडळे पुढे सरसावली आहेत. त्यासाठी या मंडळांचे संघटन अधिक मजबूत करण्याचा प्रयास सुरू झाला आहे. या संघटनेच्या कार्यकारिणीची घोषणा नुकतीच पानवल येथे झालेल्या बैठकीत करण्यात आली. त्यानुसार अध्यक्ष म्हणून प्रभाकर कांबळे (टिके), संस्थापक व कार्याध्यक्ष-श्रीधर खापरे (खेडशी), उपाध्यक्ष-अरुण कळंबटे (झरेवाडी), सचिव- विश्वनाथ गावडे, सहसचिव-सुरेश होरंबे (पानवल), खजिनदार- सुरेश येजरे, उपखजिनदार- पांडुरंग होरंबे, संपर्कप्रमुख-श्रीकांत बोंबले, प्रसिध्दीप्रमुख-विजय पाडावे, सदस्य- वसंत विठ्ठल साळवी, विलास कृष्णा भातडे, प्रमोद रामचंद्र होरंबे, मनोज तानाजी घवाळी, महादेव गोविंद कळंबटे, सचिन धोंडू तांबे, अमित सुरेश डांगे, प्रविण लक्ष्मण कळंबटे, संतोष यशवंत धनावडे, संजय कृष्णा गावडे, सुरेश गोविंद दसम, हरिश्चंद्र विठ्ठल बंडबे, सुनिल सुरेश लोगडे, दिनेश यशवंत शितप यांचा त्यामध्ये समावेश आहे.