नऊ दिवस शांततेत उत्सव : रास दांडियाला बेक्र
प्रतिनिधी/ सातारा
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वच सण साजरी करण्यावर मर्यादा आल्या आहेत. यंदाच गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरी करण्यात आल्या. यानंतर नवरात्र उत्सवाचे वेध लागले आहेत. येत्या 17 ऑक्टोबरला सुरू होणाऱया या उत्सवावर कोरोनाचे ग्रहण लागले आहे.
दरवर्षी नवरात्र उत्सवाची धुम सार्वजानिक दुर्गा मंडळ ते घराघरात पहायला मिळत होती. बाजारात घटाचे साहित्य विक्रीसाठी दाखल व्हायचे. नऊ दिवस नऊ रंगाचे वस्त्र घालण्यावर भर असायचा. दांडियाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात यायचे. यंदा मात्र कोरोनाच्या गडद छायेत हा नवरात्र उत्सव साजरी होणार आहे. अवघ्या 15 दिवसांवर आलेल्या या सणाचे महत्त्व कमी झाल्यासारखे वाटत आहे. रोजगार नसल्याने सगळेच आर्थिक संकटात सापडले आहेत. यामुळे मोठया मंडळांनी मूर्ती तयार करण्याच्या ऑर्डर दिलेल्या नाहीत. तर काही मंडळांनी उत्सव रद्द करत सामाजिक उपक्रम राबविण्याचा निर्णय घेतला आहे. नवरात्र उत्सवानिमित्त कपडे, सौदर्य प्रसाधने, दांडिया, पुजेचे साहित्य अद्याप विक्रीला आलेले नाही. अवास्तव खर्च न करता उत्सव शांततेत साजरी होण्याचे संकेत व्यापाऱयांना मिळाले आहेत. यामुळे दुकाने साहित्याअभावी ओस पडली आहेत. जिह्यात कोरोनाचा संसर्ग वाढल्याने सर्वत्र काळजीचे सावट पसरले आहे. सणापेक्षा स्वता:च्या आरोग्याची काळजी वाढली आहे. प्रशासनाने अद्याप कोणतीही नियमावली जाहीर केलेली नाही. या आधीच सातारकर नागरिकांनी उत्सवाला बेक लावला आहे. यांचा फायदा प्रशासनसह सर्वांनाच होत आहे.