वयाच्या तिशीतच ’अक्करमाशी’ हे आत्मकथन लिहून मराठी साहित्यात महत्त्वाचे स्थान निर्माण करणारे आणि दलितातीलही अतीदलित-नाकारलेल्याचे जगणे मांडणारे ज्ये÷ साहित्यिक शरणकुमार लिंबाळे यांच्या ‘सनातन’ या कादंबरीला प्रति÷sचा के. के. बिर्ला फाउंडेशनचा सरस्वती सन्मान पुरस्कार जाहीर झाला आहे. भारतीय स्तरावर एक नवीन कलाकृती म्हणून या कादंबरीची दखल घेत देशातील एखाद्या दलित लेखकाला कदाचित पहिल्यांदाच हा प्रति÷sचा पुरस्कार जाहीर झाला आहे. खुद्द लेखक शरणकुमार लिंबाळे यांनी असे मनोगत व्यक्त करताना, ‘आजवर आम्हाला मोठे पुरस्कार मिळायला हवेत असे आम्ही म्हणायचो, पण मिळत नव्हते. देशाच्या स्वातंत्र्याची पंच्याहत्तरी साजरी होण्याच्या उंबरठय़ावर एक सुंदर स्वप्न पूर्ण झाले’ अशा पद्धतीने आनंद व्यक्त केला आहे, हे खरेच आहे. भीमा-कोरेगाव लढय़ाला दोनशे वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर लिंबाळे यांनी सनातन लिहिली. देशाच्या स्वातंत्र्यासाठी दलित आदिवासींनी खूप मोठय़ा प्रमाणावर संघर्ष केला मात्र त्याची कोणीही दखल घेतली नाही, इतिहासात त्यांच्या योगदानाचा कुठेही गौरव नाही. त्यामुळे लिंबाळे यांनी दलितांच्या संघर्षाचा गौरवशाली इतिहास सांगणारी ही कादंबरी म्हणजे जणू नवा इतिहासच उभा केला आहे. या साहित्यातील जीवनमूल्ये आणि कलात्मकता आहे. लिंबाळे यांना ‘सरस्वती सन्मान’ हा या जीवनवादी साहित्याचा गौरव वाटतो हे योग्यच आहे. दुर्दैव असे की फार मोठा वाचक वर्ग अध्यापही सनातन कादंबरीपासून दूर आहे. एखादा भारतीय चित्रपट जगभरातील महोत्सवातून गाजल्यानंतर भारताला त्याची माहिती होते असाच हा प्रकार. हा दोष मराठी साहित्य वाचकापर्यंत पोहोचण्यात येत असलेल्या अनेक अडथळय़ांचा आहे. इंग्रजीसह अनेक भारतीय भाषांमध्ये त्यांचे साहित्य अलीकडच्या काळात अनुवादित झाल्याने मराठीप्रमाणे इतर भारतीय आणि जागतिक स्तरावर त्यांचे चाहते निर्माण होत आहेत. त्यामुळेच मराठीच्या कक्षेबाहेर गेलेल्या या साहित्याला मराठी भाषेतील सर्वोत्तम भारतीय साहित्य म्हणून गौरवले जाते तेव्हा मराठीला अभिमान वाटतानाच अन्यायाची एक खंतही वाटली पाहिजेच. विजय तेंडुलकर (कन्यादान 1983) आणि महेश एलकुंचवार (युगांत 2002) नंतर तब्बल 19 वर्षांनी मराठीला हा प्रति÷sचा सन्मान मिळाला आहे. लिंबाळे यांच्या बाबतीत म्हणायचे झाले तर 40 हून अधिक वैचारिक आणि परिवर्तनवादी पुस्तके लिहून त्यांनी मराठी आणि दलित साहित्यात मोलाची भर घातलेली आहे. अण्णाभाऊ साठे, नामदेव ढसाळ, बाबुराव बागुल, शंकरराव खरात, दया पवार यांच्यासह अनेकांनी आपल्या मनातली खदखद साहित्यातून व्यक्त करत दलित विचाराला दिशा दिली. त्यातून घडलेल्यांनी आंबेडकरवादी साहित्याला जीवनवादी बनवण्याचा प्रयत्न केला. तरीही हा प्रवाह मुख्य प्रवाह बनलेला नाही ही खंत आहेच. परिणामी साहित्य हे वास्तवाच्या परिघाबाहेरच तडफडताना दिसते. बहुतांश लोकांना ते आपलेसे वाटत नाही. ज्यांना आपलेसे वाटले पाहिजे त्यांना पूर्णतः पटत नाही. परिणामी ते दुर्लक्षित होऊ लागले आहे. आजच्या काळात लिंबाळे यांचे साहित्य मराठीच्या परिघाबाहेर भाषांतरीत होते आणि त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होतो याचा मराठी साहित्याने गांभीर्याने विचार करावा. आपल्याच माणसांना मराठी आपलेसे करणार नाही तर ती शेजारच्यांना आपले म्हणेल अशी शक्मयताच नाही. पंचवीस वर्षापूर्वी कविवर्य विंदा करंदीकर यांना बहुदा मध्य प्रदेश सरकारचा पुरस्कार मिळाला तेव्हा परभाषिक साहित्यिक, कवींना महाराष्ट्रात कुठलाही पुरस्कार दिला जात नाही अशी खंत व्यक्त केली होती. महाराष्ट्र शासनाने त्याची दखल घेतली नाही, मात्र पुण्यातील एक साहित्यिक संजय सोनवणी यांनी प्रत्येक वषी परभाषिक साहित्यिकाला एक लाख रुपयांचा पुरस्कार देण्याची घोषणा केली. पहिल्या वषी शेजारचे राज्य कर्नाटकातील साहित्यिकाला पुरस्कार देण्यासाठी त्यांनी वाचक, प्रकाशक, समीक्षक आणि साहित्य संस्था यांना आवाहन केले. शेवटच्या दोन घटकांच्या मतांना अधिक महत्त्व देण्याचे ठरले. मात्र त्यात योगदान न देता काही साहित्यिक मंडळींनी कन्नडच का, सर्व भाषांतून शिफारशी मागवा, समित्या नेमा अशी मागणी करून अडथळा घातला आणि तो प्रयत्न बारगळला. कालांतराने महाराष्ट्र सरकारने संत ज्ञानेश्वरांच्या नावाने परभाषिक साहित्यिकाला पुरस्कार द्यायची घोषणा केली. मात्र गत 25 वर्षात एकाही परभाषेतील
साहित्यिकाला महाराष्ट्राने गौरवलेले नाही! लिंबाळे यांच्या आधी याच सोनवणी यांनी ‘आणि पानिपत’ कादंबरीतून चार पिढय़ांच्या दलित विषयांवरील अन्याय दूर केला होता. मराठीने जरी गौरव केला नसला तरी मराठीतील एका साहित्यिकाचा ‘सरस्वती सन्मान’ होतो आहे. काळ बदलत आहे. बदलत्या काळानुसार साक्षर होणारा नवा समाज काही प्रश्न विचारतो आहे. परदेशातील विविध विद्यापीठांमध्ये देणगीदार मान्यवरांना शोषक ठरवून त्यांचे पुतळे शोषितांचे प्रतिनिधी उतरवण्याची मागणी करत आहेत. अशा काळात त्यांना शत्रू म्हणावे की त्यांचा संताप समजून घ्यावा हा प्रश्न आहे. वैचारिक प्रक्रियेत असणारा कोणालाही शत्रू न मानता, प्रश्न समजावून घेत मुळापर्यंत जाईल आणि समन्वयवादी विचार पुढे घेऊन येईल. मात्र समाजाला पुढे जायचे तर इतिहासात काय घडले ते समजून घेत पूर्वग्रह बाजूला ठेवून दुसऱयाची बाजूही तपासून घेतली पाहिजे. दलित साहित्य आणि सरस्वती सन्मान ही दोन टोकं आहेत, असेच आजपर्यंत मानले जात असताना महाराष्ट्राच्या बाहेर सन्मानाच्या दृष्टीने त्याची सांगड घातली जात आहे. समन्वयवाद्यांनी या वर्तमानाला भविष्याचा नवा इतिहास घडवण्याची एक संधी समजली पाहिजे! शरणकुमार लिंबाळे ज्यांना कधीकाळी महारवाडय़ानेही स्वीकारले नव्हते ते आज महार-वीरांची महागाथा घेऊन जगभर चालले आहेत. त्यांचा सन्मान होताना मराठीने आपल्याच एका दुर्लक्षित संस्कृतीला कवटाळण्याची संधी टाळता कामा नये.
Previous Articleसनरायजर्स हैदराबाद संघात मिशेलऐवजी जेसॉन रॉय
Next Article सायबर स्पेसमधील महिला सुरक्षा…धोके काय ?
Tarun Bharat Portal
Parasharam Patil is a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in editorial news, local news entertainment, and political content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.