वार्ताहर/जमखंडी :
गेल्यावर्षी महापूर व यंदा कोरोनामुळे राज्य परिवहन मंडळाला 2300 कोटी रुपये तोटा झाला असून आता बस वाहतूक सुरू होत असून नागरिकांनी बसमधून प्रवास करावा व संस्था तोटा भरून आर्थिक सदृढ करण्याचा आपण प्रामाणिक प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री व परिवहन मंत्री लक्ष्मण सवदी यांनी मुधोळ बसस्थानकाच्या कोनशिला समारंभात केले.
मुधोळ, अथणी, कोप्पळ, सौंदत्ती येथे अनुसूचित जाती-जमातीच्या विद्यार्थ्यांकरिता 15 कोटी रुपये खर्च करून वाहन चालविण्याची प्रशिक्षण संस्था सुरू करण्यात येणार असल्याचे सांगितले.
यावेळी उपमुख्यमंत्री गोविंद कार्जोळ, परिवहन संस्था अध्यक्ष व्ही. एस. पाटील, जि. पं. अध्यक्षा बायक्का मेटी, आम. हणमंत निराणी, जि. पं. उपाध्यक्ष मुत्ताप्पा कोमार, जिल्हाधिकारी कॅप्टन डॉ. राजेंद्र, जि. पं. सीईओ गंगुबाई मानकर आदी उपस्थित होते.