सांगली / प्रतिनिधी
नारळी पौर्णिमेच्या निमित्ताने हरिपूर येथे संगमावर भोई समाजाच्या वतीने कृष्णा आणि वारणा नद्यांना नारळ अर्पण करून प्रतिवर्षाप्रमाणे कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.
हरिपूर आणि परिसरातील कोळी तथा भोई समाज परंपरेप्रमाणे प्रत्येक वर्षी नदीला नारळ अर्पण करत असतो. सुवासिनींकडून नदीची पूजा आणि नारळ अर्पण केला जातो. दोन्ही नद्यांवर अवलंबून असणाऱ्या मासेमारीच्या व्यवसायाची कृतज्ञता म्हणून यंदाच्या वर्षीही सांगली, हरिपूर मच्छीमार सोसायटी आणि समस्त भोई समाज यांच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. संस्थेचे चेअरमन किरण रघुनाथ भोई, सचिव श्रीकांत कांबळे, मोहन मगरे, सतीश बावधनकर, सचिन भोई,संग्राम बावधनकर, बजरंग हेरले कांबळे, अनिता बावधनकर, ज्योती गवळी, विद्या बावधनकर, कविता नलवडे, सीमा भोकरे, वैशाली बावधनकर आदी या प्रसंगी उपस्थित होते.