पावसाळय़ात घरामध्ये पाणी शिरत असल्याने भिंतीचे बांधकाम करणे काळाची गरज
प्रतिनिधी/ बेळगाव
पावसाळय़ात नाल्यातील पाण्याचा निचरा होण्यासाठी नाला स्वच्छता मोहिम राबविण्यात येते. मात्र ही मोहिम तात्पुरती आणि जुजबी असते. नाल्यातील पाण्याचा फटका रहिवाशांना बसू नये यासाठी ठोस उपाय योजना राबविणे गरजेचे आहे. शहराच्या मध्यवर्ती भागातून वाहणाऱया नाल्याचे बांधकाम ठिकठिकाणी अर्धवट आहे. याठिकाणी कचरा साचतो, अन् पावसाळय़ात घरांमध्ये पाणी शिरते. याकरिता अर्धवट नाल्यांचे बांधकाम करण्याची मागणी शहरवासीयांतून होत आहे.
शहर आणि उपनगरातील नाल्यामधून वाहणारे पाणी घरांमध्ये शिरण्याचा प्रकार प्रत्येक पावसाळय़ात घडतो. नाल्यातील गाळ व्यवस्थित काढला जात नाही. ठिकठिकाणी नाल्यावर अतिक्रमण झाले आहे. महानगरपालिकेकडुनही आवश्यक उपाय योजना राबविण्यात येत नाहीत. परिणामी पावसाळय़ात नाल्याच्या पुराचा फटका नाला काठावरील रहिवाशांना बसतो. नाल्याची समस्या निवारणासाठी महापालिकेकडून दरवषी स्वच्छता मोहिम राबविण्यात येते. मात्र या स्वच्छता मोहिमेमुळे समस्येचे निवारण होते का? हा मुद्दा उपस्थित होत आहे. दरवषी पावसाळा येतो आणि दरवषी पावसाळय़ापूर्वी स्वच्छता मोहिम राबविण्यात येते. मात्र समस्येचे निवारण होत नाही. या समस्येचे निवारण करण्यासाठी नाला बांधकाम हा एकमेव पर्याय आहे. नाला बांधकाम झाल्यास नाल्यावर होणारे अतिक्रमणही रोखले जाऊ शकते. त्याचप्रमाणे नाल्यातील गाळ काढण्याची समस्या देखील भेडसावणार नाही. नाला बांधकाम करण्यासाठी महापालिकेने कृती आराखडा तयार केला होता. महापालिका व्याप्तीमधील लहान-मोठय़ा नाल्यांचे बांधकाम करण्यासाठी 150 कोटी निधीचा प्रस्ताव तयार करण्यात आला होता. शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या मुख्य नाल्यासह उपनगरातील नाल्यांचे बांधकाम करणे गरजेचे आहे.
काही ठिकाणी बांधकाम अपूर्ण
प्रत्येक पावसाळय़ात नाल्यातील पाणी गोरगरीब नागरिकांच्या घरात शिरून मोठे नुकसान होत असल्याने नाला बांधकाम मोहिम राबविण्यात आली होती. एसएफसी अनुदानांतर्गत शहरातील नाल्याचे विविध ठिकाणी बांधकाम करण्यात आले आहे. विशेषत: कपिलेश्वर कॉलनी, शिवाजी उद्यान, इंद्रप्रस्त नगर, शास्त्री नगर अशा भागात नाला बांधकाम करण्यात आले आहे. पण नाल्याचे बांधकाम करताना काही ठिकाणी बांधकाम अपूर्ण राहिले आहे. त्यामुळे नाला बांधकाम झाले नसलेल्या ठिकाणी अतिक्रमण होत आहे. त्याचप्रमाणे कचरा साचून सांडपाण्याचा निचरा व्यवस्थित होत नाही. पावसाळय़ामध्ये नाल्यातील पाणी घरांमध्ये शिरत आहे. त्यामुळे अर्धवट असलेल्या नाल्याचे बांधकाम पूर्ण करण्याची आवश्यकता आहे.
नाल्यामध्ये कचरा टाकण्याचे प्रमाण मोठय़ा प्रमाणात
नाला बांधकाम झाला नसलेल्या ठिकाणी अस्वच्छता निर्माण होत आहे. नाल्यामुळे झाडे-झुडपे वाढुन कचरा अडकून रहात आहे. नाल्यामध्ये कचरा टाकण्याचे प्रमाण मोठय़ा प्रमाणात आहे. शिवाजी रोड येथील नाल्यामधून दर आठवडय़ाला दोन टीप्पर कचरा काढला जातो. अशा प्रकारे मोठय़ा नाल्यामध्ये देखील कचरा साचत आहे. पण हा कचरा काढला जात नाही. धर्मवीर संभाजी चौकातून कोनवाळगल्ली, शिवाजीरोड मार्गे पाटील मळय़ातून वाहणाऱया नाल्याचे बांधकाम पूर्णपणे ढासळले आहे. नाल्यामध्ये कचरा साचला असल्याने व झाडेझुडपे असल्याने सांडपाण्याचा निचरा होत नाही. त्यामुळेच नाल्याला पूर येवून मागील वषी पाटीलमळय़ातील घरे कोसळण्याचा प्रकार घडला होता. तसेच शास्त्राrनगर परिसरात देखील नाल्याचे बांधकाम अर्धवट असल्याने काही गल्ल्यांमध्ये पावसाचे पाणी शिरते. बांधकाम नसलेल्या ठिकाणाचा कचरा महापालिकेकडून काढला जात नाही. त्यामुळेच नागरिकांना याचा फटका बसत आहे. नाला स्वच्छता मोहिम केवळ वर्षातून एकदा राबविण्यात येते. ज्या ठिकाणी नाल्याचे बांधकाम झाले आहे. त्या ठिकाणी विशेषत: कचऱयाची समस्या उद्भवत नाही. पण नाला बांधकाम नसलेल्या ठिकाणी झाडे झुडपांमुळे नाल्याच्या स्वच्छतेचा प्रश्न निर्माण होतो. त्यामुळे अर्धवट असलेल्या ठिकाणाचे नाला बांधकाम करण्याची मागणी होत आहे.
महापालिका व्याप्तीमधील नाल्याचे बांधकाम करण्यात येते. तसेच स्वच्छता करण्यात येते. पण शहरातुन वाहनारे नाले बळ्ळारी नाल्याला जाऊन मिळतात. त्यामुळे शेत शिवारातून नाले वाहतात, पण शेत शिवारातून वाहणाऱया नाल्याची स्वच्छता महापालिकेकडून केली जात नाही. त्याचप्रमाणे तहसीलदार विभागाकडे येणाऱया नाल्याची स्वच्छता करण्यात येत नाही. त्यामुळे या नाल्याची स्वच्छता कोण करणार? हा मुद्दा निर्माण होतो. शेत शिवारामधुन वाहणाऱया नाल्याची स्वच्छता करण्यात येत नसल्यानेच नाल्यातील पाण्याचा निचरा व्यवस्थित होत नाही. परिणामी शहरात नाल्याला पूर येतो. विशेषता समर्थ नगर परिसरापासून नाल्यातील पाणी अडण्यास प्रारंभ होतो. त्यामुळे कपिलेश्वर कॉलनी, शिवाजी उद्यान, शास्त्री नगर अशा भागात नाल्यातील पाण्याचा निचरा होत नाही. शेत शिवारातील नाल्याची स्वच्छता केली जात नसल्यानेच शहराला बॅक वॉटरचा फटका बसतो. त्यामुळे शेत शिवारातील नाल्याची स्वच्छता आणि बांधकामासाठी आवश्यक कारवाई करणे गरजेचे आहे. समर्थ नगर परिसरातील रस्त्या शेजारी नाल्याचे बांधकाम केल्यास येथील पावसाळय़ातील समस्येचे निवारण होऊ शकते. त्यामुळे महापालिकेच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने नाला बांधकामासाठी आवश्यक उपाय योजना राबवुन निधीची तरतूद करावी व पावसाळय़ात निर्माण होणाऱया समस्येचे निवारण करावे अशी मागणी होत आहे.