तीन दिवसांपासून रिमझिम सुरुच : किडीच्या प्रादुर्भावात वाढ झाल्याने शेतकऱयात चिंता
वार्ताहर / किणये
नावगे किणये परिसरात बुधवारीही अवकाळी पावसाने दमदार हजेरी लावली. गेल्या तीन दिवसापासून या परिसरात पावसाची रिमझिम चालू असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. बुधवारी या भागाला चांगलेच झोडपून काढले आहे. यामुळे अवकाळीचे संकट या परिसरावर कायम आहे. तालुकाभर पाऊस नसला तरी ढगाळ वातावरण कायम असल्याने कडधान्य पिकाला मारक ठरले आहे.
सतत होणाऱया अवकाळी पावसामुळे शेतकऱयांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. रब्बी हंगामातील मसूर, हरभरा, वाटाणा आदी पिकांवर किडीचा प्रादुर्भाव वाढत असल्याने खराब होऊ लागली आहेत. याचा फटका रब्बी हंगामातील उत्पादक शेतकऱयांना बसणार आहे. हरभरा, वाटाणा येत्या 15 ते 20 दिवसानंतर काढणीला येणार आहे. मात्र ऐन हातातोंडाला आलेले पिकच पावसामुळे खराब होऊ लागल्याने शेतकऱयांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान होत आहे.
सध्याचा पाऊस बटाटा पिकाला मारक
पश्चिम भागात उन्हाळी बटाटय़ाची लागवड मोठय़ा प्रमाणात केली जाते. शिवारात बटाटा पीक बऱयापैकी बहरुन आले आहे. त्यामध्ये कोळपणी व भांगलणीचे कामे सुरू आहे. सध्या सुरू असलेला पाऊस बटाटा पिकालाही मारक ठरू लागला आहे.
या बटाटा पिकांवर हवामान व पावसामुळे किडीचा प्रादुर्भाव वाढू लागला आहे. यामुळे बटाटा उत्पादनात घट होणार असल्याची शक्यता शेतकऱयांतून वर्तविली जात आहे.
निसर्ग साथ देत नसल्याने चिंता
वारेमाप पैसा खर्च करून बटाटा बियांणे खरेदी करून शेतकऱयांनी त्याची लागवड केली आहे. मात्र निसर्ग व्यवस्थित साथ देत नसल्यामुळे उत्पादक शेतकरीही अडचणीत आला आहे. खरीप हंगामात लागवड केलेला बटाटा अतिवृष्टीमुळे पाण्याखाली गेला. यावेळी शेतकऱयांचे मोठे नुकसान झाले. झालेल्या नुकसानीची भरपाई बहुतांश शेतकऱयांना प्रशासनाकडून मिळालीच नाही. उन्हाळी बटाटा पिकांतून चार पैसे मिळतील या आशेवर बटाटा पीक घेण्यात आले आहे. मात्र वारंवार होत असलेल्या अवकाळीमुळे पिके धोक्मयात आली आहेत.
रब्बीतील पिकांचे मोठे नुकसान
किणये, बहाद्दरवाडी, कर्ले, जानेवाडी, नावगे, कावळेवाडी, बिजगर्णी, बेळगुंदी, बाची, बेळवट्टी, सोनोली, राकसकोप, आदी परिसरात बुधवारी पाऊस झाला. सध्या काही शिवारामध्ये शिल्लक राहिलेल्या भात मळण्या शेतकरी करीत होते. मात्र पावसामुळे या मळणीच्या काममध्ये व्यत्यय निर्माण झाला आहे. एकंदरीत ढगाळ वातावरण व अवकाळी पावसामुळे रब्बीतील पिकांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान होऊ लागले आहे. यामुळे शेतकऱयांची चिंता वाढली आहे.