प्रतिनिधी/ सातारा
कोरोनामुळे पुढे ढकलेली एनईईटीची परीक्षा रविवारी पार पडली. सातारा जिह्यात 13 केंद्रावर ही परीक्षा दुपारी 2 ते 5 या वेळेत घेण्यात आली. परीक्षेकरता साताऱयाच्या केंद्रावर धावतपळत आलेल्या काही परीक्षार्थींना वेळेत गाडय़ा न मिळाल्याने परीक्षा केंद्रावर पोहचण्यास उशीर झाल्याने परिक्षार्थीना परीक्षेपासून मुकावे लागले. साताऱयातील केबीपी इंजिनिअरींग कॉलेजच्या बाहेर सुरक्षा रक्षकास विनंती करुनही आतमध्ये सोडण्यात आले नसल्याने त्यांना परत फिरावे लागले.
आपल्या मुलांना डॉक्टर बनवण्यासाठी एनईईटीची परीक्षा महत्वाची असते. त्याकरता विद्यार्थ्यांनी व पालकांनी निकाल जाहीर होता. या परीक्षेचे अर्ज भरले होते. कोरोनामुळे ही परीक्षा कधी होईल हे सांगता येत नव्हते. 2 मे पासून परीक्षेची तारीख निश्चित होत नव्हती. 12 सप्टेंबरला ही परीक्षा होत आहे. सातारा जिह्यात छत्रपती शिवाजी कॉलेज, डीजी कॉलेज, यशंवतराव चव्हाण कॉलेज, कर्मवीर भाऊराव पाटील अभियांत्रिकी महाविद्यालय, पोदार इंटरनॅशनल स्कूल, सुखात्मे इंग्लिश मिडीयम स्कूल लिंब फाटा अशा 13 परीक्षा केंद्रावर ही परीक्षा पार पडली. परीक्षेकरता सकाळपासूनच परीक्षा केंद्रावर पालक व विद्यार्थ्यांनी गर्दी केली होती. कोरोनामुळे आणि त्यात रविवारची सुट्टी असल्याने सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अतिशय संथगतीने असल्याने अनेक परीक्षार्थींना परीक्षा केंद्रावर पोहचण्यास वेळ लागला. परीक्षा केंद्रामध्ये पुकारुनच परीक्षार्थीना परीक्षा केंद्रात घेतले जात होते. मात्र, पाच मिनिटे उशीर झाला तरीही विद्यार्थ्यांनी विनंती करुनही आत सोडले नसल्याने अनेकांना परीक्षेपासून मुकावे लागले. दरम्यान, निवासी उपजिल्हाधिकारी सुनील थोरवे यांचा अशा परीक्षांवर कंट्रोल असतो परंतु यावेळी खाजगी शाळेकडे दिला गेला होता. त्यामुळे प्रशासना अभाव दिसून आला.