ऑनलाईन टीम / पटना :
बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्याच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी आज मधुबनी येथील हरलाखी येथे सभा घेतली. या सभेत नितीश कुमारांनी नोकरीबद्दल बोलताच त्यांच्यावर भर सभेत दगडफेक करण्यात आली.
या घटनेनंतर नितीशकुमार यांच्याभोवती सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली. नितीश यांनी निवडणूक बैठकीत आपले भाषणही पूर्ण केले. सुरक्षा रक्षक दगडफेक करणाऱ्यांना पकडण्यास गेले तेव्हा नितीशकुमार यांनी त्यांना मध्येच अडवले. ते म्हणाले, ‘या लोकांना सोडून द्या, काही दिवसांनी ते स्वतःला समजून घेतील.’
दरम्यान, बिहारमध्ये 28 ऑक्टोबरला पहिल्या टप्प्यात 71 मतदारसंघात मतदान झाले. आज दुसऱ्या टप्प्यात 94 मतदार संघात मतदान सुरू आहे. तर 7 नोव्हेंबरला तिसऱ्या टप्प्यात 78 मतदारसंघात मतदान होणार आहे. 10 नोव्हेंबरला या निवडणुकांचा निकाल जाहीर होणार आहे.