काठमांडू
शेजारी देश असलेल्या नेपाळला बिगरमोसमी पावसाने झोडपून काढले आहे. या अतिवृष्टीमुळे या हिमालयीन देशात पूराचे संकट निर्माण झाले आहे. पुरानंतर अनेक ठिकाणी झालेल्या भूस्खलनामुळे आजवर 100 हून अधिक जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती आहे. या नैसर्गिक संकटात 35 जण बेपत्ता झाले आहेत. शेतपिकांबरोबर मालमत्तेचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले आहे. बचाव व मदतकार्यांना गती देण्यात आली आहे. विविध जिल्हय़ातील 4000 हून अधिक जणांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आल्याचे प्रशासनाने सांगितले आहे. पूर्वेला प्रांत 1 व पश्चिममध्ये सुदूर व करवाली प्रांतात पावसाने मोठे नुकसान केले आहे. नेपाळमध्ये आलेल्या या पुराचा फटका भारतातील उत्तरप्रदेश आणि बिहार या राज्यांनाही फटका बसण्याची शक्यता आहे. याचमुळे या राज्यांमध्ये विशेष खबरदारी घेतली जातेय.