नवी दिल्ली / प्रतिनिधी
काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी वड्रा (priyanka GandhiWadra) यांनी सोमवारी नोटबंदीला “देशाची आपत्ती” (Desaster) म्हणून संबोधले आणि विचारले की जर हे पाऊल यशस्वी झाले असेल तर भ्रष्टाचार का संपला नाही आणि काळा पैसा देशात का परत आला नाही. 8 नोव्हेंबर 2016 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी(PM Modi) यांनी राष्ट्रीय दूरचित्रवाणीवर त्याच दिवशी मध्यरात्रीपासून 500 आणि 1,000 रुपयांच्या उच्च मूल्याच्या सर्व चलनी नोटांवर बंदी घालण्याच्या सरकारच्या निर्णयाची घोषणा केली होती.
“जर ‘नोटबंदी (Demonitisation) यशस्वी झाली, तर भ्रष्टाचार का संपला नाही? काळा पैसा परत का आला नाही? अर्थव्यवस्था कॅशलेस का झाली नाही? “दहशतवादाला फटका का बसला नाही? भाववाढीला लगाम का नाही लावला?” गांधी यांनी ‘डिमॉनेटायझेशन डिझास्टर’ (Demonitisation Desaster) हॅशटॅग वापरून हिंदीत ट्विट केले. नोटाबंदी लोकांच्या हिताची नसून त्याचा अर्थव्यवस्थेवर विपरीत परिणाम होत असल्याचा आरोप काँग्रेस करत आहे.