शेतकऱयांचा आक्षेप : नाव कमी करण्यासाठी दिले बुडा आयुक्ताना निवेदन
प्रतिनिधी / बेळगाव
वसाहत योजना राबविण्यासाठी बुडाने पिकावू शेतजमीन संपादित केली आहे. मात्र, काही शेतकऱयांनी न्यायालयात धाव घेऊन भू-संपादनास स्थगिती घेतली आहे. तरीदेखील काही शेतकऱयांच्या सात-बारा उताऱयावर बुडाने आपले नाव दाखल केले आहे. त्यामुळे शेतकऱयांच्यावतीने बुडा आयुक्तांना निवेदन देऊन उताऱयावरील नाव कमी करावे, अशी मागणी केली आहे.
वसाहत योजनेसाठी 165 एकर पिकावू जमीन बुडाने संपादित केली होती. मात्र, काही शेतकऱयांनी वसाहत योजना राबविण्यास आक्षेप घेऊन न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्यामुळे 42 एकर भू-संपादनास न्यायालयाने स्थगिती दिली आहे. उर्वरित शेतजमीन मालकांनी योजना राबविण्यास सहमती दर्शविली असल्याने सदर जागेचा ताबा बुडाने यापूर्वीच घेतला आहे. सहमती दर्शविलेल्या शेतकऱयांच्या जमिनीच्या सात-बारा उताऱयावर बुडाने आपले नाव दाखल केले आहे. पण न्यायालयात याचिका दाखल केलेल्या शेतकऱयांच्या जमिनी संपादित करण्यास न्यायालयाने स्थगिती दिली आहे. त्यामुळे त्या जमिनी शेतकऱयांच्या कब्जामध्ये आहेत. शेतकऱयांच्या सात-बारा उताऱयावर नाव दाखल केले नाही. पण न्यायालयात याचिका प्रलंबित असलेल्या व भू-संपादनास स्थगिती असलेल्या दोन शेतकऱयांच्या सात-बारा उताऱयांवर बुडाने आपले नाव दाखल केले आहे. न्यायालयात याचिका प्रलंबित असतानाच बुडाने नाव दाखल केल्याने याला शेतकऱयांनी आक्षेप घेतला आहे. सात-बारा उताऱयावरील नाव कमी करावे, अशा मागणीचे निवेदन कणबर्गी येथील शेतकरी उमाकांत हलगेकर व सिद्धाप्पा मालाई यांनी दिले आहे. बुडाने तातडीने नावे कमी करावीत, अशी मागणी बुडा आयुक्तांकडे करण्यात आली आहे.