पंजाबमध्ये कोरोना संसर्गाचे बुधवारी सकाळपर्यंत 57 रुग्ण आढळले असून 4 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. संसर्ग रोखण्यासाठी देशभरात 21 दिवसांची टाळेबंदी लागू करण्यात आली आहे. तर पंजाबमध्ये 10 दिवसांपासून संचारबंदी लागू आहे. कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी राज्यातील नेते आणि अधिकाऱयांच्या सुरक्षेत तैनात 1900 कर्मचाऱयांना परत बोलाविण्यात आले आहे. मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी राज्यातील संचारबंदी 14 एप्रिलपर्यंत वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. या कालावधीत पोस्ट, कुरियर, बँक आणि एटीएम सेवा सुरूच राहणार आहे.
Previous Articleदेशव्यापी टाळेबंदीमुळे 5 टक्के ट्रकच रस्त्यांवर
Next Article जोस बटलर करणार वर्ल्ड कप फायनलच्या जर्सीचा लिलाव
Tarun Bharat Portal
Parasharam Patil is a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in editorial news, local news entertainment, and political content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.