ऑनलाईन टीम / चंदीगड :
दिल्ली आंदोलनावरून परतलेल्या एका शेतकऱ्याने विष प्राशन करून आत्महत्या केल्याचा प्रकार पंजाबच्या बठिंडा जिल्ह्यातील दयालपुरा मिर्झा गावात रविवारी सकाळी घडला.
गुरलाभ सिंह (वय 22) असे या तरुण शेतकऱ्याचे नाव आहे. कृषी कायद्याच्या निषेधार्थ दिल्लीच्या सीमेवर सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या धरणे आंदोलनात सिंह सहभागी झाला होता. शनिवारी रात्री उशिरा तो आपल्या घरी परतला. रविवारी सकाळी तो घराबाहेर पडला आणि घराजवळील शेतात विष प्राशन करून आत्महत्या केली. कुटुंबीयांना आणि गावकऱ्यांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनी त्याला जवळच्या हॉस्पिटलमध्ये नेले. मात्र, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.