प्रतिनिधी/ सातारा
दिवाळखोरीत गेलेली पंडीत ऑटोमोबाईल कंपनी चुकीच्या पद्धतीने खरेदी करून कामगारांना कोणतीही पूर्व कल्पना न देता त्यांचे पगार, व इतर सोयी सुविधापासून वंचित ठेवल्याने याच्या विरोधात कामगारांनी कुंटुबासह मंगळवारी आंदोलन केले. या आंदोलनाची माहिती मिळताच पोलीस आंदोलनस्थळी पोहचले. यावेळी कामगारांनी कंपनीत जाण्याचा प्रयत्न केल्याने त्यांना रोखण्यात आले. यावरून पोलीस व कामगारांच्या वादावादी झाल्याने काही काळ येथे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
पंडीत ऑटोमोबाईल कंपनीच्या ऑटोमोबाईल कामगार संघटनेने मंगळवारी कंपनीच्या गेटवर आंदोलन केले. गेले 25 ते 30 वर्ष हे कामगार येथे कार्यरत आहोत. कंपनीने त्यांचे पगार थकवले असून मात्र पगार मिळावेत अशी ऑर्डर कोर्टाकडून घेतल्या आहेत. तरीही वेगळ्या पद्धतीने काही गोष्टी निर्माण करून कामगारांना हिसकावून लावण्यात आले. स्वतः संघटनेच्या कर्मचाऱयांनी याविरूद्ध रिट याचिका दाखल केली असून कोर्टात यांची केस सुरू आहे.
जे थ्री 1, जे थ्री 2, जे सेवन हा प्लॉट हा कृषी ऍग्रो कंपनीच्या मालकांनी घेतली. साई आणि महालक्ष्मी ऍग्रो ही कंपनी स्थापन करण्यात आली. मालकाला पूर्व कल्पना देवूनही याचा विचार न करता बॅंकेकडून जागा विकत घेतल्याचे सांगितले. या कंपनीच्या मालकांना रातोरात गेट बदलले. यांनी जागा घेतली बॅक ऑफ बडोदाकडून पण येस बॅंकेने येथे 42 कोटी रूपये येणे बाकीचा बोर्ड लावला आहे. पोलिसांनी म्हणणे ऐकून न घेता पेपर दाखवण्यात सांगितले. या प्रकरणामध्ये जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, प्रांत यांना निवेदन दिले आहेत.
रक्षकच बनले भक्षक
तरीही या कंपनीत 80-90 कर्मचारी या कंपनीत घालुन मुळ मालक येथे हजर नसताना मोठे गेट बदलून छोटय़ा गेटला वेलिंड मारून कामगारांच्या सगळ्या गाडय़ा आतमध्ये अडकलेल्या आहेत. 7-8 वर्ष कामगारांना पेमेंट मिळालेले नाही. आमच्यावर उपासमारीची वेळ आलेली आहे. कोर्टात याचिका दाखल करून सुद्धा आम्हाला न्याय मिळून सुद्धा वेगवेगळ्या गोष्टी वेगळ्या पद्धतीने सांगून कामगाराचे हक्क डावलण्यात येत आहेत. आज रक्षकच जर भक्षक बनू लागले तर जगण्याला आमचा काही अर्थ राहायचा नाही, असे ऑटोमोबाईल कर्मचारी संघटनेच्या सदस्यांनी सांगितले.