वृत्तसंस्था/नवी दिल्ली :
कोरोनाची साथ पसरत असल्याच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आज शुक्रवारी देशवासियांशी संवाद साधणार साधतील असे सांगण्यात आले आहे. देशाला ते सकाळी 9 वाजता एक संदेश देणार आहेत. त्यात लॉकडाऊन पाळण्याचे महत्व व इतर सूचनांचा समावेश असेल, असे सांगण्यात आले आहे. कोरोनाची साथ पसरल्यापासूनचा त्यांचा हा तिसरा जनसंपर्क आहे. त्यांनी दोन वेळा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून संपर्क साधला आहे.