नवी दिल्ली / ऑनलाईन टीम
देशातील कोरोना साखळी दिवसेंदिवस घट्ट होत आहे. तसेच आरोग्य यंत्रणा अपूरी पडत आहे. या भयंकरस्थितीमुळे विदेशातून भारताला मदतीचा ओघ सूरु झाला आहे. मात्र देशातील आवश्यक घटकांसाठीची नसणारी यंत्रणा, रुग्णालयांमध्ये घडत असलेले अग्नितांडव या साऱ्या प्रकारावरुन समोर येणाऱ्या ढीसाळ यंत्रणेवर एआयएमआयएमचे अध्यक्ष आणि खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी बोट ठेवलं आहे.
खासदार ओवैसी यांनी म्हटलं आहे की, कोरोनामुळे आपल्या प्रियजनांना गमावलेल्या नागरिकांची पंतप्रधान मोदी यांनी माफी मागावी. देशाचे पंतप्रधान स्मशानभूमी आणि कब्रिस्तान बद्दल तासनतास बोलू शकतात, परंतु ते रुग्णालयांबद्दल कधीही बोलू शकत नाहीत. कारण देशातील अनेक नागरिकांनी आपल्या प्रियजनांना ऑक्सिजनचा अभाव, बेड्स, औषधे या कमतरतांमुळे गमावले आहे. त्या नागरिकांची मोदींनी माफी मागावी.