ऑनलाइन टीम / नवी दिल्ली :
‘आज के शिवाजी नरेंद्र मोदी’ या पुस्तकावर सर्व स्तरातून विरोध होत आहे. यावर आता या पुस्तकाचे लेखक जयभगवान गोयल यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. पक्षाने आदेश दिला तर पुस्तक मागे घेऊ. असे त्यांनी म्हटले आहे.
ते म्हणाले, ज्या प्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज काम करायचे त्याप्रमाणे नरेंद्र मोदी काम करत असल्याने आपण त्यांचा उल्लेख महाराजांच्या नावे केला असल्याचं सांगितलं. तसंच कोणाच्याही भावना दुखावण्याचा आपला हेतू नव्हता असंही ते म्हणाले आहेत.
पुस्तक मागे घेणार का ? अशी विचारणा केली असता त्यांनी सांगितलं की, आता पुस्तक बाजारात आलं आहे. पक्ष सांगेल त्याप्रमाणे करणार. जर पक्षाने पुस्तक मागे घेण्यास सांगितलं तर पुस्तक मागे घेऊ. अनेकजण राम, कृष्ण म्हणत लोकांची तुलना देवाशी करतात. मी काही चुकीचं काम केलेलं नाही. ही माझी भावना आहे.