जांबोटी तील फोटोग्राफरचा अनैतिक संबंधातूनच खून झाल्याचे निष्पन्न
खानापूर/ वार्ताहर
जांबोटी येथील छायाचित्रकार विजय आवलक्की यांचा खून अनैतिक संबंधातील अडथळा दूर करण्याच्या हेतूने पत्नीनेच करवून आणल्याचे स्पष्ट झाले. या प्रकरणी विजय यांची पत्नी सुबोधा (वय 46) हिला पोलिसांनी अटक केली असून तिची हिंडलगा कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. सुबोधा आणि प्रमुख संशयित रामचंद्र बाबुराव कांबळे (दोघेही रा. जांबोटी) यांच्यात अनैतिक संबंध होते. अधिक माहिती अशी की, 25 डिसेंबरला विजय यांचे नारायण ज्ञानेश्वर मेंडीलकर (वय 20, रा. कालमणी) याने वाढदिवसाची छायाचित्रे काढण्याच्या निमित्ताने अपहरण केले होते. त्यानंतर 27 ला त्यांचे शीर धडावेगळे करून खून करण्यात आल्याचे उघडकीस आले. प्रमुख संशयित रामचंद्र याने सुबोधा व त्याच्यातील अनैतिक संबंधांची कबुली दिली होती. खुनात सहभाग असलेल्या सर्व संशयितांना अटक झाली होती. पण, सुबोधाला अटक झाली नव्हती. पोलिसांनी गुरुवारी तिला ताब्यात घेऊन चौकशी केली असता रामचंद्रशी असलेल्या अनैतिक संबंधात अडसर ठरत असल्याने पतीच्या खुनाचा कट रचल्याचे कबूल केले. फोटोग्राफर विजय हे जांबोटी येथे फोटोग्राफीचा व्यवसाय करीत होते. 25 डिसेंबर रोजी त्यांचे नारायण मेंडीलकर (वय 21, रा.कालमणी) या तरुणाने दोन वर्षाच्या मुलाच्या वाढदिवसाचे फोटो काढण्याच्या निमित्ताने आपल्या दुचाकीवरून त्याचे अपहरण केले. व चोर्ला मार्गावरील एका धाब्यावर त्याच्या खुनाचा कट शिजला. दरम्यान विजय यांच्या मुलीने वडिलांचे अपहरण झाल्याची तक्रार खानापूर पोलिसांत नोंदविली होती. विजय हा त्या दिवशी सायंकाळी रामचंद्र यांच्या दुचाकीवरून गेल्याचे अनेकांनी पाहिले होते. याच संशयावरून रामचंद्र याचा या अपहरणात हात असल्याच्या मागोवा घेत पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन पोलिसी खाक्मया दाखविल्यानंतर हादरवून टाकणारा प्रकार उघडकीस आला.
नारायण मेंडीलकर, रामचंद्र कांबळे आणि अन्य तिघा अल्पवयीन तरुणांनी विजय यांना चिखलेच्या जंगलात नेऊन विजयशी वादावादी केली व सोबत असलेल्या चाकूने त्यांना भोसकले. त्यानंतर त्यांचे शीर धडावेगळे केले. पुरावे मिटवून टाकण्यासाठी धड त्याचठिकाणी पुरण्यात आले. तर शीर विजय यांच्याच कॅमेऱयाच्या बॅगमध्ये भरून कालमणीच्या कावळे नाल्यात फेकून देण्यात आले. कॅमेरा एका झुडपात टाकून लपवून ठेवला होता. तपासादरम्यान तो पोलिसांनी ताब्यात घेतला. सुरुवातीला जांबोटी येथील कांहीनी नारायण आणि रामचंद्र यांच्याकडे विजय कुठे आहे, अशी चौकशी केली असता उडवाउडवीची उत्तरे मिळाली. पण संशय बळावल्याने ग्रामस्थांच्या सहकार्याने त्यांच्या मुलीने अपहरणाची तक्रार नोंद केली. पोलिसांनी तपासाचा वेग वाढवून अवघ्या 24 तासात खुनाचा छडा लावला. सर्व संशयीत आरोपींच्या मुसक्मया आवळून दोघांची हिंडलगा कारागृहात तर तिघांची बालसुधारगृहात रवानगी केली. पत्नीनेच दिली होती सुपारी पोलिसांना या प्रकरणात विजय यांच्या पत्नीचा हात असल्याची शंका सुरुवातीपासून होती. त्यामुळे त्यांच्याकडून तक्रार नोंदवून घेण्याऐवजी मुलीकडून तक्रार नोंदवून घेण्यात आली. संशयीत आरोपी सुबोधा यांचे मोबाईल रेकॉर्ड तपासले असता, तिने खुनाची माहिती रामचंद्रकडून घेतल्याचे उघड झाले. तसेच त्यांच्यातील अनैतिक संबंधांचाही उलगडा झाला. अनेक दिवसांपासून त्यांच्यात अनैतिक संबंध होते. त्याची कुणकूण विजय यांना लागल्यानंतर त्यांनी दोघांनाही समज दिली होती. शिवाय रामचंद्र याला कामावरून काढून टाकले होते. त्याच रागातून पत्नी सुबोधा आणि रामचंद्र यांनी दोघांनी मिळून खुनाचा कट रचला. त्याला नारायण आणि अन्य तीन अल्पवयीन तरुणांची साथ लाभली. नारायण याला देण्यासाठी दहा हजार पत्नीनेच रामचंद्रला दिले होते. या प्रकाराची कल्पना ग्रामस्थांना होतीच. शिवाय विजयच्या खुनामुळे संपूर्ण जांबोटी परिसर हादरला होता. त्यामुळे गावकऱयांनी तिला गावातून हाकलून लावण्याचा चंग बांधला असतानाच पोलिसांनी तिच्या मुसक्मया आवळल्या.
या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक सुरेश शिंगी, उपनिरीक्षक बसगौडा पाटील यांनी अगदी शिताफीने गुन्हेगारांना जेरबंद केले. त्यामुळे जांबोटी भागातील सर्वसामान्यांतून समाधान पसरले आहे. शिवाय त्यांना कठोरात कठोर शिक्षा व्हावी यासाठीही या भागातील नागरिकांनी पोलिसांकडे विनंती केली आहे.