सातारा / प्रतिनिधी
परराज्यातील आपापल्या गावी रेल्वेने जाऊ इच्छिणाऱ्या सातारा जिल्हयातील मजूराचा खर्च कॉग्रेस पक्ष करणार आहे, अशी माहिती जिल्हाध्यक्ष डॉ. सुरेश जाधव यांनी पत्रकाद्वारे दिली. त्यांनी दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, केंद्र सरकारने केवळ चार तासाची मुदत देवून लॉकडाऊन जाहिर केल्यामुळे लाखो मजूर आपापल्या गावी जावू शकले नाहीत.त्यातील काहीजण आठशे ते हजार कि.मी. पायपीट करत गेले आहेत. त्यामुळे लहान मुले व महिला यांचे फार मोठया प्रमाणात हाल झाले आहेत. 1947 च्या फाळणीनंतर प्रथमच असे विदारक चित्र देशात पहायला मिळाले.आजही लाखे मजूर देशाच्या अनेक भागामध्ये अडकन पडले आहेत.त्यांना आपापल्या गावी जायचे आहे.त्यांच्याजवळ पैसेही नाहीत मजूर संकटात असताना भारत सरकार व रेल्वे मंत्रालय या मजुरांकडुन गाडी भाड्यासाठी पैसे घेत आहे हे दुर्दैव आहे. परदेशात अडकलेल्याना आपण आपले कर्तव्य म्हणून विशेष विमान पाठवून त्यांना मायदेशी आणण्याची मोफत सोय केली. गुजराथ मधील एका कार्यक्रमाच्या भोजन व प्रवासासाठी शंभर कोटी रुपये खर्च केले. रेल्वे मंत्रालय जर प्रधानमंत्री केअर फंडाला 151 कोटी रुपये देणगी देवू शकते तर देशाच्या विकासात ज्याचे योगदान आहे. त्या गरीब मजुरांना मोफत रेल्वेची सुविधा का देवू शकत नाही. त्या मजूरांच्या मोफत रेल्वे प्रवासासाठी काँग्रेस पक्षाने वारंवार मागणी केली परंतु ना केंद्र सरकारने ना रेल्वे मंत्रालयाने त्याकडे लक्ष दिले म्हणून काँग्रेस पक्षाच्या आदरणीय श्रीमती सोनिया गांधी यांनी ठाम भूमिका घेवून निर्णय घेतला की, या मजूराना त्यांच्या मूळ गावी मोफत परत पाठविण्यासाठी त्या-त्या राज्यातील प्रदेश काँग्रेसपक्ष त्या मजूरांच्या रेल्वे प्रवासाचा खर्च करेल. त्यांच्या भूमिकेला महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी तात्काळ प्रतिसाद दिला.
मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या आदेशाप्रमाणे सातारा जिल्हयातील परप्रांतियांचा खर्च कॉग्रेस पक्ष करणार आहे. तरी सातारा जिल्हयातून आपापल्या गावी जावु इच्छिणा-या मजुरांनी आपली नोंदणी त्या गावच्या तलाठयामार्फत प्रत्येक तालुक्याच्या तहसीलदार कार्यालयात करावी. त्या-त्या याद्याप्रमाणे जिल्हाधिकारी कार्यालयाशी संपर्क साधून परवातियाची
रेल्वेने जाण्याची सोय करता येईल. तरी सर्वांनी नोंदणी करावी असे आवाहन जिल्हाध्यक्ष डॉ.सुरेश जाधव यांनी केले व काही अडचण असलेस काँग्रेस पदाधिका-यांशी संपर्क साधण्याचे आवाहन केले. हेल्पलाईन 9595529237, 9890099933 यावर संपर्क साधावा असे आवाहन ही त्यांनी केले आहे.